Home बातम्या इंदूर : कवितेतून कविता

इंदूर : कवितेतून कविता

0

महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरच्या ६१ व्या शारदोत्सवा निमित्ताने नुकतेच इंदूर येथे कविसंमेलन आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य सभा, लोकमान्य नगर निवासी मंडळ आणि लोकमान्य नगर शिक्षण समितीच्या कविवर्य सुधीर बापट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केला होता.

या कवि संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे “कवितेतून कविता” सादर करणे होय. सर्व कवींनी नामवंत मराठी कवी भा.रा.तांबे, इंदिरा संत, शांता शेळके, कुसुमाग्रज, बालकवी, गोविंदराव झोकरकर, नारायण सुर्वे, सुरेश भट, मंगेश पाडगांवकर, दत्ता हलसगीकर, केशवकुमार, ना.धो.महानौर सारख्या कवींच्या बद्दल संस्मरण, त्यांची कविता सादर करत त्याच बाजाची आपली कविता सादर केल्या. ही संकल्पना साहित्य सभेचे संचालक श्री मदन बोबडे यांची होती.

या अभिनव संमेलनामुळे वर्तमान पिढीला जुन्या पिढीतील साहित्यिकांच्या कवितांचा साक्षात्कार झाला. श्रोत्यांनी भरगच्च भरलेला सभागृहात प्रत्येक कवितेला टाळ्यांचा प्रतिसाद मिळत राहिला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे साहित्यकार लतिका खानविलकर, ऊषा वैशंपायन आणि प्राची बापट होत्या.

पाहुण्यांचा सत्कार साहित्य सभेचे अध्यक्ष श्री अश्विन खरे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा भागवत यांनी केले. आभार वसुधा गाडगीळ यांनी मानले.

ह्या संमेलनाच्या आयोजनात इंदूर येथील रचनाकार श्री विश्वनाथ शिरढोणकर, अरुणा खरगोणकर, अलकनंदा साने, श्रीकांत तारे, राधिका इंगळे,जया गाडगे, ज्ञानेश्वर तीखे, सुषमा अवधूत, वैजयंती दाते, ऐश्वर्या डगांवकर आणि मनीष खरगोणकर यांनी सहभाग घेतला.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version