Tuesday, June 17, 2025
Homeबातम्याअसे झाले, साहित्य कणा संमेलन

असे झाले, साहित्य कणा संमेलन

साहित्यकणा फाउंडेशनच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक येथे नुकतेच साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. तर अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ऐश्वर्य पाटेकर होते व्यासपीठावर पं. अविराज तायडे, यशवंत पाटील आणि फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे आणि सचिव विलास पंचभाई उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीपाल सबनीस म्हणाले,
रडणाऱ्या माणसांचे साहित्य लिहिण्यापेक्षा लढणाऱ्या माणसांचे साहित्य लिहिले गेले पाहिजे.
गळ्यात गळे घालुन जाणे महत्वाचे असते. गळे कापणे महत्वाचे नाही. संवेदनशील समाज निर्मितीचे कार्य राजकीय मंडळी नष्ट करत असल्यामुळे छोटी साहित्य संमेलनं महत्वाची ठरतात.

तर अखिल भारतीय साहित्य संमेलनात फक्त गर्दी होते तळमळ दिसुन येत नाही छोटेखानी संमेलनातुनच साहित्यिक घडत असतात असे मत ऐश्वर्य पाटेकरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत महेश उपासनी यांनी “गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रणव पाटणकर, विलास पाटणकर यांनी स्वागतगीत सादर केले. तर सुरेखा बोराडे यांनी सूत्रसंचालन केले.

या संमेलनात रावसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काव्य स्पर्धा झाली सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आशा गोवर्धने व प्रणाली पंचभाई यांनी केले. परीक्षण प्रा आशा पाटील व वैजयंती सिन्नरकर यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान श्री अनंत वाणी यांच्या ‘आनंददायी युरोप ‘ हे प्रवास वर्णन तर रजनी अनंत वाणी यांच्या ‘भावना अंतरीच्या’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या “आजचे साहित्य मूल्यहिन झालेले आहे का?” या परिसंवादात
प्रा. दिलीप पवार प्रा. प्रतिभा जाधव व प्रवीणजी जोंधळे सहभागी झाले होते. तर सूत्र संचालन राज शेळके यांनी केले.
‘आजचे साहित्य मूल्यहीन झालेले नाही. मात्र पालकांनी आगामी पिढीला वाचनाचा वारसा देण्याची गरज आहे’ असा सूर व्यक्त करण्यात आला.

विश्वास बँकेचे अध्यक्ष श्री विश्वास ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते, वाङ्ममय पुरस्कार, तसेच कविता स्पर्धा विजेत्यांना गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे आहेत.
ज्ञानरत्न पुरस्कार : प्रकाश कोल्हे.
साहित्यरत्न पुरस्कार : रवींद्र माळुंजकर.
समाज रत्न पुरस्कार : बापु कोतवाल
दिव्यांग रत्न पुरस्कार : बोडके
वाडःमय पुरस्कार : सुमनताई पंचभाई
स्मृती कविता संग्रह पुरस्कार : मनीषा पाटील हरोलीकर, सांगली . तन्वी अमित नाशिक
मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार : प्राध्यापक यशवंत माळी, सांगली.
पुष्पा चोपडे शीलाताई गहिलोत राजपूत कादंबरी पुरस्कार : निरजा, मुंबई
राहुल पाटील स्मृती बालसाहित्य पुरस्कार: प्राध्यापक डॉक्टर सुनील विभुते
कविता स्पर्धा विजेते :
प्रथम : ऐश्वर्या नेहे
द्वितीय : आर.पी. शिखरे
तृतीय: सौरभ आहेर
चतुर्थ : रेखा सोनटक्के
पाचवा : प्रणाली पंचभाई व देव थोरात .
विशेष उल्लेखनीय : श्रेया नावरकर

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?