कुठे आणि कधी आपले जग बदलत गेले हे कळलेच नाही. ह्याला आपणच सो कॅाल्ड झाल्यामुळे न कळतच आपणच जबाबदार आहोत.
जाणवत सगळ्यांनाच असेलही .पण बदलायचे दुसर्यांनी आपल्यासाठी !काय झालय नेमके, तर अलिप्तपणा आलाय. नको वाटते कोणाशी बोलावसे . करू नये कोणाच्या आयुष्यात लुडबुड. आपण बरे, आपले काम बरे .
कोणी कसेही वागले तरी वागू द्यावे!
वाईट कशाला व्हा ? भावनिक कोरडे पणा आलाय .एक सांगू का ? आपण सगळे रेसचे घोडे झालोय . धावून धावून दमलोय. त्यामुळे दुसऱ्यासाठी काही जाणीव राहिली नाही. सुरक्षित आयुष्य जगण्याची धडपड करतोय .
पूर्वीच्या माणसांनी कधी आपल्या भोवती कुंपणेच आखली नव्हती त्यामुळे प्रेम जिव्हाळा , आदर , मदतीच्या भावनाची रेंज होती. आता मात्र सोशल एटिकेटस् , मॅनर्स नको तिथे जपतोय . खर तर तेच नकोय आपण करायला.
म्हणून एकटे पडत चाललोय. ह्याची झलक कोविड मध्ये मिळालीच आहे सगळ्यांना . विशेष करून हा बदल प्रकर्षाने घरगुती नातेसंबंधामध्ये जास्त जाणवू लागलाय . सुख दुख्ाचे शेअरींग आणि केअरिंग बंद झालेय . व्हॅटस अॅप वर कोरड्या शुभेच्छांचा वर्षाव असतो . कलीयुगाचा प्रभाव नक्कीच जाणवतोय .
पूर्वीच्या लोकांची पुण्याई संपत आली . बिझी बिझी असल्याची अफरमेशन्स आपण आपल्यालाच देत असतो . देव म्हणतो तथास्तु .आपणच आपल्याला आऊट ऑफ रेंज केलय . असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. मार्ग एकच जर आपल्या भोवती घातलेले कुंपण काढले तर रेंजमध्ये पुन्हा नक्कीच येऊ .
तुम्हाला काय वाटतं ?

– लेखन:: शलाका कुळकर्णी, नेदरलँड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.