Tuesday, June 17, 2025
Homeबातम्याआदिवासी बांधवांची दिवाळी झाली गोड

आदिवासी बांधवांची दिवाळी झाली गोड

आपल्या समाजात असे अनेक वंचित घटक आहेत ज्यांना एकवेळचे जेवण सुद्धा नीट मिळत नाही. तर काहीजणांना कपडे सुद्धा धड नसतात. अशा गरिबीत सापडलेल्या आदिवासी बांधवांसोबत, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी विविध आदिवासी पाड्यांवर दिवाळीचे फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली जाते.

थोडे का होईना आदिवासी बांधवांचे दुःख दूर करण्याचा उद्देशाने याही वर्षी काल रायगड जिल्ह्यातील चिरनेर, अक्कादेवी वाडी येथे दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले. हा दिवाळीचा फराळ मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. आदिवासी बांधवांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत उपस्थित सर्वांचे आभार मानले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सल्लागार शिक्षक सुधीर मुंबईकर, अध्यक्ष सुदेश पाटील, सल्लागार कुमार ठाकूर, चिरनेर अक्कादेवी वाडीचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सनी बोरसे, अभिनेते सुभाष कडू, सामाजिक कार्यकर्त्या निकिता पाटील, सानिका पाटील, प्रेम म्हात्रे, प्रणय पाटील उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सोशल मीडिया प्रमुख साहिल म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, सुमित कोळी, अंश कोळी, नमित कोळी, प्रणित पाटील, सुविध म्हात्रे, ओमकार म्हात्रे, हेमंत ठाकूर, यश म्हात्रे, आर्यन पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक संजय पवार व सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले.

– टीम एनएसटी ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आदिवासी समाज सेवा पाहून खुप आनंद होतो आहे. असे सर्व ग्रामीण भागात गोरगरीब जनते पर्यंत पोहोचलेच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments