Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यकोणा घालावं गाऱ्हाणं

कोणा घालावं गाऱ्हाणं

अशी पावसाची रात
मन नाही थाऱ्यावर
रात्रभर चिंता जाळी
कधी कोसळे छप्पर

ढग वाजविती ताशा
नभी वीज कडाडते
दडे बसती कानात
अंगी कापरं भरते

झालं शिवारात तळं
गेला जिण्याचा आधार
उभ्या पिकाचं मातेरं
पुन्हा नशीबी अंधार

साऱ्या जगाचा पोशिंदा
राही स्वतःच उपाशी
नाव मोठ्ठं बळीराजा
दुनियेची रीत खाशी

निसर्गाचा नाईलाज
कधी पावतो, कोपतो
काय करावं त्यानंही
माणुसच वैरी होतो

मिळे सगळ्यांना न्याय
सरकारी दरबारी
नाही दाद नाही थारा
किती कराव्या तक्रारी

माल आमचाच परि
मोल मनाजोगं नाही
कोणा घालावं गाऱ्हाणं
शोध घेतो दिशा दाही

भारती महाजन-रायबागकर

– रचना : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा