Wednesday, June 18, 2025
Homeलेखजगणं म्हणजे ......

जगणं म्हणजे ……

लहान मुलांसाठी म्हटलेल्या गोष्टवजा गाण्यात अमिताभ म्हणतो, “ये जीना भी कोई जीना है लल्लू”. खरं तर हेच आपल्या जीवनाचं, जगण्याचं अंत:सूत्र आहे. जगणं म्हणजे आनंद रावे जगणं म्हणजे समाधान आणि आनंद यातील भेद आपण जगताना लक्षात घेतच नाही कांदा भाकरी खाणारा शेतकरी असो वा आईच्या फार तर जानूच्या हातची आपली आवडती भाजी किंवा रेसिपी खाणारा शहरी चाकरमानी असो. घरातले घरातल्या जेवणात मिळते ते समाधान; हॉटेलमध्ये आनंद.

समाधानात 99% तृप्ती असते एक टक्का आनंद. निव्वळ आनंदासाठी आपण जे काही करतो त्यात एक टक्काच तृप्ती असते 99% उत्साह. समाधान कुठेच नसते. उत्साह हळूहळू उन्मादाकडे वळत जातो. आनंदाचे उत्साहारा कधी विरजण लागते हे आपल्याला समजतही नाही. शहरी नागरिकांनी आणि त्यांच्या अनुकरणाने ग्रामीण भागातील नागरिकांनीही उत्सवातील उत्साहाचे उन्मादात रूपांतर कधी झाले हे जाणलेच नाही.

जगण्याचं समाधान व्यक्तिसापेक्ष आहे आनंद हा समष्टी सापेक्ष. एखाद्या वातानुकूलित रेस्टॉरांमधून किंवा पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर भिकाऱ्यावर टाकलेला कुत्सित कटाक्ष समाधानाचा निश्चितच नसतो त्यात उन्मादच असतो.

जगण्याची एकच फुटपट्टी असते तिच्या एका बाजूला परिमाणाचे छोटे अंक असतात तर दुसऱ्या बाजूला त्या छोट्या अंकांचे मोठे एकक असतात. हे छोटे अंक असतात त्यांना यु अँड एन या आद्याक्षरांनी ओळखले जातात तर मोठया एकाकांना एस. डब्ल्यू. ओ. टी. म्हटले जाते. आयुष्यातील छोटे-मोठे निर्णय घेताना जेव्हा आपण चाचपडतो त्यावेळी जनांचे ऐकावेच असे नाही मात्र या मोजपट्टीचा आधार जरूर घ्यावा.

यु अँड एन अर्थात अर्थात युटिलिटी आणि नेसेसिटी म्हणजेच उपयुक्तता आणि आवश्यकता दुसऱ्या बाजूचे एकक आहेत ते स्ट्रेंगथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट अर्थात स्वॉट. निर्णय प्रसंगीची आवश्यकता आणि उपयुक्तता यांचा विचार केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणे संयुक्तिक ठरत नाही. निर्णयक्षमता आपले वर्मस्थान, मर्मस्थान, संधी आणि संभाव्य धोके यांच्या निकषांवर घासून पहावी. हे निकष आत्मपरीक्षणाचे आहेत.

आपले वर्मस्थान, दौर्बल्य इतरांच्या हाती लागू देऊ नये. आपला कच्चा दुवा इतका क्षीण करावा की तो इतरांना दिसताच कामा नये. आपले मर्म, ताकद, क्षमता इतकी वाढवावी की तिनेच आपले वर्म झाकले जावे. प्राप्त परिस्थितीतील संधी आपल्याला ओळखता यायला हवी. भविष्यातील धोके समजून घेता आले पाहिजेत. एकदा जमलं की मग जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगी सुद्धा सहज निर्णय घेता येतात आणि त्या निर्णयाचे समाधान बाळगून जीवन अधिकाधिक सूकर करता येते, तेच खऱ्या अर्थाने जगणे असते.

सुधीर ब्रह्मे

– लेखन : सुधीर ब्रह्मे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. जीवनाचा अर्थ सुरेख समजावून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?