Sunday, November 2, 2025
Homeसाहित्यजीवन गती

जीवन गती

कशामुळे आहे सांगा आयुष्याला गती ?
कशामुळे माणूस करतो, सतत प्रगती ?
कधी कळेल, नक्की कुणा, समाधान काय ?
थोडे थांबा,आनंदाचा शोध, हा उपाय,

कधी स्मरेल देवा तुला, गतिमान जग ?
रोज नव्या समस्यांचा, जन्मतो संसर्ग,
बाहेरून शान सारी, आत जीव रीता ?
कळेल कधी, समरांगणी का सांगितली गीता?

जय पराजय नित्य युद्ध असेच रे चाले,
माणूस झाला आहे, त्याचा लोभाचे बाहुले,
किती ताण, दडपण, मन ना मोकळे,
कसे जगती हे जीव, प्रारब्ध रोकडे ?

कळू दे रे देवा यांना, मोल हसण्याचे,
कळू दे रे सुख, दुखः, कुणा जपण्याचे,
आधाराचे बोल देती, कशी रे उभारी,
जगणे कळु दे, उंच मारता भरारी…!!!

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on गझल
Priyanka Shinde Jagtap on पुस्तक परिचय
मोहन आरोटे on निवृत्तीचे तोटे !
Meera Rajesh Khutale on बदललेली ती….
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप