महान संगीतकार सचिनदेव बर्मन, ज्यांना आपण एस डी बर्मन म्हणून ओळखतो, त्यांच्या घरी 27 जून 1939 रोजी राहुलदेव बर्मन यांचा जन्म झाला. लहानपणी रडताना त्यांचा पाचवा स्वर पडत असे त्यावरून आर डी यांना पंचम हे नाव पडले. जे कायमस्वरूपी झाले.
आर डी 16 वर्षांचे असताना त्यांनी एक धून बनवली, जी त्यांनी वडिलांना ऐकवली. त्या धूनचा वापर एस डी नी फटूश या 1956 मधील देव आनंदच्या फिल्म साठी “ऐ मेरे टोपी पलट के आ” या गाण्यात केला.
आर डी यांची लहानपणा पासूनच हार्मोनिअम वर खूप कमांड होती. संगीताची आवड असल्याने पंचम यांनी संगीतकार होण्याचे ठरवले आणि ते वडिलांसोबत सहाय्यकाचे काम करू लागले.
आपण स्वतः संगीतकार बनावे असे आर डीं ना वाटे. त्या दृष्टीने लवकरच संधी मिळाली. विनोदी अभिनेता महमुद ने 1961 ला “छोटे नवाब” मधुन संगीतकार म्हणून त्यांना प्रथम ब्रेक दिला. त्यानंतर “भूत बंगला” यातही त्यांनी संगीत दिले. महमूदच्या या दोन्ही फिल्म ने सुरवात तर झाली पण यश येत नव्हते. कारण त्या काळी त्यांचे वडील एस डी बर्मन, नौशाद, शंकर जयकिशन, रोशन, ओ पी नय्यर यांच्या नावाचा दबदबा होता. त्यामूळे या दोन्ही फिल्मचे गाणे चालूनही आर डी नां संगीतकार मानायला कुणी तयार नव्हते.
1966 साल उजाडले. नासिर हुसेन -विजय आनंद दिग्दर्शित “तिसरी मंझील” ही फिल्म शम्मी कपूर ला घेऊन बनवत होते. शम्मी च्या फिल्म्स ला शंकर जयकिशन हेच संगीत देत. पण गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनीं नासिर हुसेन यांना आर डी यांचे नाव सुचवले. ते बेस्ट संगीत देणार असा त्यांना विश्वास होता. शम्मी कपूर ने पण आर डीं कडून बऱ्याच धून ऐकल्या आणि अशा प्रकारे संगीत तयार झाले. “ओ हसीना जुल्फो वाली”, “आजा आजा मै हु प्यार तेरा” किंवा “ओ मेरे सोना रे दे दुगी जान” अशी सर्वच गाणी सुपरहिट झाली. यानंतर आर डीं नी कधीच मागे वळून पाहिले नाही. नासिर हुसेन ने पण त्यानंतर पंचम नां “बहारो के सपने” “प्यार का मौसम”, “हम किसींसे कम नही”, “यादो की बारात” यात पुन्हा संधी दिली. ही सर्व गाणी सुपरहिट झालीत.
एस डी बर्मन आजारी असताना आर डीं नी “मेरे सपनो की राणी”, “रूप तेरा मस्ताना” या धून किशोरदा यांच्या आवाजात रेकॉर्ड केल्या. त्या गीतांनी राहुलदेव बर्मन हे नाव सगळीकडे प्रसिद्ध झाले. आर डी बर्मन आणि राजेश खन्ना या जोडीला खूप दाद मिळाली. “कटी पतंग”, “आप की कसम”, “अजनबी”, “द ट्रेन”,
“मेरे जीवन साथी”, “मेहबूबा” या सर्वच फिल्म्समधील सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट झालीत. त्यातील काही गीत जसे, “ओ मेरे दिल के चैन”, “मेरे नैना सावन भादो”, “गुलाबी आखे जो तेरी देखे”, “जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम ओ फिर नहीं आते”, “जीस गली मे तेरा घर ना हो” असे अनेक.
रफी, किशोर, मुकेश, मन्ना डे, लता, आशा या सर्वांना बरोबर घेऊन अनेक हिट गाणी आर डीं नी दिलीत. सर्वांसोबत त्यांचे छान ट्युनिंग जमले होते. आर डी हे प्रयोगशील संगीतकार होते. त्या काळी लोक म्हणत,
“ये वक्त के आगे का म्युझिक देता है”.
1973 मध्ये आलेल्या देव आनंद च्या “हरे रामा, हरे कृष्णा” मधील आशाच्या आवाजातील “दम मारो दम” चा ताजेपणा आजही दिसतो. 1972 च्या “जवानी दिवानी” तील किशोर-आशा यांच्या आवाजातील “जाने जा धुंडता फिर रहा हु, तुम्हे रात दिन” हे गाणे आजही ऑर्केस्ट्रात हिट आहे. तसेच आशाजी पण गातात. “चुरा लिया है तुमने जो दिल को” (यादो की बारात) रफी – यांचे इजाजत मधील आशाच्या आवाजातील “मेरा कूछ सामान तुम्हारे पास पडा है “किंवा “खाली हाथ शाम आयी कारवा” चे हेलन च्या डान्स वर आशाजीं च्या आवाजात “पिया तू अब तो आजा” आणि आर डीं चे “मोनिका ओ माय डार्लिंग” अशी अनेक गाणी कोणी विसरेल ? “गोलमाल” सारख्या कॉमेडी फिल्म मधील “आने वाला पल जाणे वाला है” हे असो की घर सारख्या भावनिक फिल्ममधील “फिर वही रात है आप की आखो मे कुछ महके हुवे से राज है” आर डी कुठे ही कमी पडत नाही.
70 च्या दशकातील 1 नंबर ची फिल्म शोले यात पण जबरदस्त संगीत, त्याबरोबर बॅकग्राऊंड संगीत आर डी यांनी दिले. त्यांनी स्वतः गायलेले “मेहबूबा मेहबूबा” हे सुपरहिट ठरले. आर डीं चा आवाज किशोर, रफी सारखा सुंदर नव्हता. पण त्यांनी जे पण गीत गायले ते हिट झाले. जसे “दुनिया मे लोगो को धोका हो जाता है” (अपना देश 1972.) “समंदर मे नहाके और भी नमकीन हो गयी” (पुकार 1983) “ये दिन तो आता है एक दिन जवानी मे” (महान 1983). “कल क्या होगा किस्को पत्ता जिंदगी का लेलो अब मजा “(1978 कसमे वादे) ही यादी वाढू शकते.
फिल्म इंडस्ट्रीत पंचम इतके लोकप्रिय झाले होते, की धर्मेंद्र, सुनीलदत्त, राजेंद्र कुमार यांच्या मुलांच्या प्रथम फिल्मला (बेताब- सनीदेओल 1983) (रॉकी – संजयदत्त 1981) (कुमार गौरव- लवस्टोरी 1981) या सर्व फिल्म्स हिट झाल्या. जब हम जवा होगे, क्या यही प्यार है, याद आ रही है ही यातील काही गाणी.
अवॉर्ड चे बाबतीत बोलाल तर 3 वेळा पंचम नां मिळाले. 1982 ला सनम तेरी कसम आणि 1983 ला मासुम साठी. त्यातील “तुजसे नाराज नही जिंदगी” हे गीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. आणि 1942 लव स्टोरी साठी त्यांना 1994 ला मरणोत्तर पुरस्कार भेटला होता.
1967 पासून आर डीं चा जो भरभराटीचा काळ होता तो 1985 पर्यंत चालू होता. अगदी 1985 पर्यंत सागरची सर्व गाणी सुपरहिट झालीत. त्यातील सागर किनारे साठी किशोरदा यांना अवॉर्ड पण मिळाले तर संगीत रवींद्र जैन यांना राम ‘तेरी गंगा मैली साठी मिळाले.
त्यानंतर ग्रहण लागले, पंचमच्या 20 ते 22 फिल्म्स फ्लॉप झाल्या. पंचम यांचे संगीत फारसे चालेनासे झाले. अगदी सुभाष घई यांच्या “कर्मा” साठी आर डीं ना घेतले पण नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना घेण्यात आले. सर्व जण आर डी यांना फ्लॉप संगीतकार बोलायला लागले. आर डी संपला असेच सर्व बोलत होते.
विधु विनोद चोप्रा यांनी 1942 a लव स्टोरी या आपल्या फिल्म साठी, पंचम यांच्यावर संगीताची जबाबदारी सोपविली. गीतकार जावेद अख्तर होते. पंचमने या फिल्म द्वारे जबरदस्त वापसी केली. “एक लडकी को देखा तो”, “कुछ ना कहो”, “प्यार हुवा चुपके से”, “रिमझिम रिमझिम” सर्वच गाणी रेकॉर्ड ब्रेक झालीत. पंचम इज बॅक ! त्यांनी दाखवून दिले की, टॅलेंट जास्त काळ लपून राहू शकत नाही.
ज्या फिल्म इंडस्ट्रीने त्याला फ्लॉप म्हणून हिणवले होते ते त्यांना पुरस्कारासाठी बोलवत होते. पण हे यश पंचम पाहू शकले नाहीत. 4 जानेवारी 1994 ला हार्ट अटॅकने वयाच्या 55 व्या वर्षी, महान संगीतकार “मैं शायर बदनाम” मैं चला म्हणत सर्वाना सोडून गेले. कायम नवीन बनविण्याची इच्छा मनाशी बाळगणारा संगीतकार खूप दूर निघून गेला होता. पंचम मरा नही, पंचम मरते नही, पंचम का संगीत सदैव हमारे साथ रहेगा.
आपल्या संगीतामुळे पंचमदा जिवंत आहे 💐

– लेखन : संदिप भुजबळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
खुपचं छान
खुपच सुंदर
खरेचं पंचम दांचे काम अप्रतिम आहे .आजही त्यांनी संगीतबद्ध केलेली गानी रसीक मनावर राज्य करून आहेत .खुप छान लेख .👌👌👌
👌👍
सुंदर शब्दांकन 👌👍👍👍
🌹अप्रतिम 🌹
खूप छान माहिती दिली आपण
🌹धन्यवाद श्री. संदीप भुजबळ साहेब 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ