Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यापर्यावरण संवर्धन काळाची गरज - सुनेत्रा पवार

पर्यावरण संवर्धन काळाची गरज – सुनेत्रा पवार

पर्यावरण संवर्धन व संतुलन ही काळाची गरज आहे.
हवामानात वेगाने होणारे बदल धोकेदायक आहेत. पुढील काळात प्रत्येकानेच पर्यावरणाच्या संतुलनासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज आहे या शब्दांत एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बारामतीत पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत सुनेत्रा पवार यांनी आपले विचार व्यक्त केले.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सल्लागार राज देशमुख, मंडळाच्या सचिव वनश्री मोरे अध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण सखी मंचच्या अध्यक्षा प्रियवंदा तांबोटकर राज्य व जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी स्नेहीजन उपस्थित होते.

धीरज वाटेकर यांच्या अभ्यासपूर्ण मनोगतानंतर बारामती परिसरातील सामाजिक व पर्यावरणीय कार्याचा आढावा घेणारी मधुसिंधू प्रवर्तक माधुरी काकडे यांनी सादर केलेली कविता रसिकांची दाद घेऊन गेली.

परिसंवादात उपस्थित दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी सुनेत्रा पवार यांनी सुसंवाद साधला व योग्य ते मार्गदर्शन करून मदत करण्याचे आश्वासन दिले. देवराई प्रकल्पाविषयी सकारात्मक प्रयत्न करू असे सांगितले.

दोन्ही संस्थांच्या एकत्रित सहकार्याने पुढील कार्य करण्याची अनेक सदस्यांनी इच्छा बोलून दाखवली.
‘आम्हाला पाहुणचार करायला आवडते.’ असे गोड निमंत्रण पुन्हा एकदा देऊन सुनेत्रा पवार यांनी सर्वांची मने जिंकली.

एकंदरीत कार्याची ध्वनीचित्रफित दाखवली गेली. काही पुस्तके सस्नेह भेट देण्यात आली.

मंडळाचे सल्लागार ‘जलदूत’ राज देशमुख यांनी आभार मानले.
समारोपात सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथील संमेलनाची उत्सुकता ठेवून परिषदेची सांगता झाली.

मातीतल्या खेळांची जत्रा, वृक्षारोपण, माझी वसुंधरा पुरस्कार व बारामती आयकॉन पुरस्कार वितरण कार्यक्रम, वृद्धाश्रमास भेट,मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे जयंतीनिमित्त छोटासा कार्यक्रम , पर्यावरण परिषद, निर्मलग्राम काटेवाडीला भेट, कॉटनकिंग टेक्स्टाईलला भेट, औषधी वनस्पतींची बाग, स्टोन गार्डनला भेट अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेला ज्ञानवर्धक, मनोरंजक, सुंदर, सौहार्द अनुभूती देणारा हा दोन दिवसांचा दौरा प्रत्येकाच्या आठवणीतील अनमोल ठेवा आहे, असे अनेकांच्या प्रतिक्रियेतून जाणवत होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे . बारामतीचा उपक्रम खुप स्तुत्य आहे .धन्यवाद 🙏🙏🙏 बारामतीला सर्वांचेचं स्वागत होते अतिथी देवो भव: ही इथली संस्कृती .आहे .👍👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments