तप्त झालीस वसुंधरे तू
कोप तुझा साहवेना
कोणत्या झाल्या चुका की
काही केल्या शांतवे ना
काहीली का एव्हढी ती
कायाच अवघी तापली
कुणी काय केले संतापण्याला
धग पेटती ती राहिली
छायेत जगतो आम्ही तुझ्या
उद्विग्न का तू जाहली
रुष्ट तो वरुण राज ही
का व्यथा ना जाणली
तप्त झालीस तू अशीकी
शांतवाया येई तो
तव अंगणी शिंपूनी पाणी
आल्हाद देऊनी जाई तो
याच वेळी काय झाले
भेट का दुरावली
वणवाच होऊनी अंतरी तू
साऱ्या जगावर कोपली !!

– रचना : सुनंदा पानसे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुप सुंदर कविता 👌👌👌.धन्यवाद 🙏