Wednesday, August 6, 2025
Homeबातम्या'प्रेमचंद यांनी शेतकरी, मजूर, सर्वहारा वर्गाचे चित्रण केले'- प्रा.डॉ.सचिन कदम

‘प्रेमचंद यांनी शेतकरी, मजूर, सर्वहारा वर्गाचे चित्रण केले’- प्रा.डॉ.सचिन कदम

गंगाखेड येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने नुकतीच ‘मुंशी प्रेमचंद’ जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी प्रेमचंद यांच्या साहित्यावर बोलतांना संगमनेर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रा.डॉ. सचिन कदम म्हणाले की, प्रेमचंद यांनी ‘कृषि आणि शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या विवंचनेवर आपली लेखनी प्रखरतेने चालवली. प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कादंबरीचा शेतकरी नायक ‘होरी’ कर्जाच्या विवंचनेतून आत्महत्या करतो. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीची ही समस्या आजही कायम आहे. किंबहुना या समस्येने आज उग्र रूप रूप धारण केले आहे. रोज कुठे ना कुठे महाराष्ट्रात आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करतो आहे. ‘पूस की रात’ ही कथा देखिल याच आशयाची आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत व मान्यवरांनी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केली. डॉ.सचिन कदम यांचा सत्कार करण्यात आला.

प्रो.डॉ.एम.डी.इंगोले यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केले. प्रा.डॉ.भेंडेकर यांनी आभार मानले. सहकारी प्रा.डॉ.एम.आर. हाके, प्रा.सुहास देशमाने यांनी संयोजन केले.

या प्रसंगी प्रो.डॉ.दयानंद उजलंबे, प्रो.डॉ.कीर्तिकुमार मोरे, प्रो.डॉ.संजय कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरक्षा रक्षक बालाजी जवादे यांनी विशेष परिश्रम घेतले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !
संदीप सुरेंद्र भुजबळ on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !