Thursday, June 19, 2025
Homeबातम्या"भरारी"ची भरारी

“भरारी”ची भरारी

मुंबई येथील भरारी प्रकाशनच्या  लता गुठे लिखित “सोलमेट” या २०० व्या पुस्तकाचे तसेच ‘तार्‍यांचे जग’ व ‘धमाल मस्ती‘ या दशकपूर्ती दिवाळी अंकांचे प्रकाशन नुकतेच विले पार्ले येथील साठे महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी, लेखक अशोक बागवे, मौज प्रकाशनच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर, आमदार पराग अळवणी, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गजानन रत्नपारखी तसेच न्यूजस्टोरीटुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी “सोलमेट” कथा संग्रहातील कथेचे अभिवाचन लेखक, अभिनेते प्रकाश राणे यांनी रंगतदारपणे केले.

आमदार पराग अळवणी यांनी आपल्या भाषणात “लता गुठे यांचा साहित्यिक प्रवास मी जवळून पाहिला आहे. गेली १२ वर्ष अतिशय सातत्याने, मेहनतीने साहित्यसेवेचे व्रत धारण करुन साहित्याची त्या सेवा करत आहेत” असे गौरोद्गार काढले.

पराग अळवणी

मोनिका गजेंद्रगडकर यांनी त्यांच्या मनोगतातून ‘सोलमेट’ मधील कथांची वैशिष्ट्ये उलगडून दाखविली. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी गोष्ट आणि कथा यातील फरकही समजावून सांगितला.

मोनिका गजेंद्रगडकर

प्रा अशोक बागवे यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या रचनातील उदाहरणं देऊन साहित्याची निर्मिती सकस कशी असू शकते हे त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले. पुस्तक हातात घेऊन वाचण्यात जी गंमत आहे ती ई- बुकमध्ये नाही. पुस्तक कायमस्वरूपी संग्रही राहतात, सोबत करतात असेही ते म्हणाले.

प्रा अशोक बागवे

श्री देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या भाषणात, लता गुठे यांच्या प्रकाशनाच्या तपपूर्तीतील अर्ध्या वाटचालीचे आपण साक्षीदार असून आजही मोठ्या प्रमाणात पुरुष प्रधान व्यवसाय असलेल्या प्रकाशन व्यवसायात लता गुठे यांनी घेतलेल्या भरारीचे व त्यांना साथ देणारे त्यांचे पती, निवृत्त अतिरिक्त विक्रीकर आयुक्त श्री वाल्मीक गुठे यांचे कौतुक केले.

या सोहळ्यात न्युज स्टोरी टुडे पोर्टलच्या कवयित्री असलेल्या लता गुठे यांचा सत्कार पोर्टलच्या निर्मात्या अलका भुजबळ यांनी केला.

भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुठे यांनी आपल्या प्रास्ताविकात त्यांचा मागील बारा वर्षाचा साहित्य प्रवास व त्यांना आलेले अनुभव विशद केले. तसेच या प्रवासामध्ये ज्यांची ज्यांची त्यांना मदत झाली त्यांचे आभार मानले.

प्रकाशिका लता गुठे

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी खुमासदारपणे  केले.

यावेळी एसीपी अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त संपादक अशोक पानवलकर, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, कवयित्री चारुलता काळे, रविराज गंधे, लेखक गुरुनाथ तेंडुलकर, मेघना साने, विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

– टीम एनएसटी. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
Mrs Vandana Suhas Inamdar on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…