Thursday, January 1, 2026

मन

मन वढाळ म्हणे बहिणाबाई
भूमीवरी कधी आकाशी जाई
पृथ्वी प्रदक्षिणाही घालून येई
कोपऱ्यातच मग लपून राही

आनंदाने गाणे गाता गाता
उदास कधी जाता जाता
फुरंगटोनी जाई कधी मधी
समजावण्यास लागे अवधी

आनंदाने कधी फुलपाखरू
असते कधी उधळलेला वारू
हत्तीचे असते अंगी कधी बळ
कधी पडते होऊनी निष्फळ 

आठवणी भुतकाळातल्या
सतावती सदा वर्तमानाला 
भविष्याला आडसर होती
विसरणे आपल्याच हाती

सांगड मन आणि बुद्धीची
साथ देई शरीरा उत्साहाची
घडतील चमत्कार जगती
तरतील बांधव अल्पमती 

बांधा मनी एक  खूणगाठ
जगेन जगवेन मानाने ताठ
नको मनी अविचारी विकार
होवू आनंद सागरावर स्वार

— रचना : डॉ.सौ अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”