संवादासाठी आवश्यक कलांची जाण आणि संवाद साधण्याची वृत्ती असलेली माणसेच खरी माध्यमधर्मी असतात. इतर सारे माध्यमकर्मी आहेत ! प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात माध्यमधर्मी माणसेच अपेक्षित सुधारणा घडवून आणू शकतील, असे मनोगत भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी श्री नितीन केळकर यांनी व्यक्त केले. श्री केळकर यांना मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
श्री केळकर पुढे म्हणाले की, पारंपरिक माध्यमांमध्ये ज्यांना मनाप्रमाणे काम करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत नसेल तर त्यांनी बाहेर पडून नवमाध्यमाची कास धरावी. कारण निखळ, निकोप संवादाची आज नितांत गरज आहे.
प्रारंभी मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या प्रमुख, पत्रकार शीतल करदेकर यांनी सर्वांचे स्वागत करून पुरस्कारांमागील भूमिका स्पष्ट केली.
पद्मश्री अशोक सराफ, अभिनेते सयाजी शिंदे हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहू न शकल्याने त्यांना घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्नेही, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
अल्प परिचय
नीतीन केळकर यांचे वप्राथमिक शिक्षण खामगाव येथे तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळ येथे झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागातून वृत्तव्यवसाय पदवी मिळविली.
श्री केळकर हे ऑक्टोबर 1983 ते फेब्रुवारी 1986 आकाशवाणी नागपूर केंद्रावर नैमित्यिक वृत्तनिवेदक होते. त्यासोबतच त्यांनी स्वतः दैनिक महाविदर्भ, दैनिक नागपूर पत्रिका या वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम केले.
ते 1 जानेवारी 1987 पासून भारतीय माहिती सेवेत रुजू झाले. पुढे योजना पाक्षिकात उपसंपादक, सहसंपादक तर पुढे मुंबई दूरदर्शन केंद्र, पुणे आकाशवाणी, क्षेत्रीय प्रचार कार्यालय, छ. संभाजीनगर, औरंगाबाद, पुणे येथे विविध पदांवर काम केल्यानंतर ते 30 सप्टेबर 2021 रोजी संचालक (वृत्तसेवा), आकाशवाणी पुणे या पदावरून निवृत्त झाले.
श्री केळकर यांनी प्रत्येक ठिकाणी अभिनव उपक्रम राबविले. या बद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या शिवाय श्री केळकर हे त्यांच्या उपहास गर्भ कवितांसाठी ओळखल्या जातात.त्यांचे “पाचर “आणि “इति-हास” हे दोन कवितासंग्रह प्रकाशित.
पाचर यशवंतराव चव्हाण स्मृती आणि इति-हास भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
सुरेख विचार.