Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यमानवजन्म

मानवजन्म

बोलणे निःशब्द झाले, वागणे ही बदलले |
माणसाचे माणसाशी, नाते सारे संपले ||

जाहला संसार सारा, कोरडा अन् मतलबी |
स्वार्थापायी बदलणे जणू, नवीन त्याची ही खुबी ||

तोलुनी सारीच नाती, केली किंमत बाजारी |
नाती म्हणजे उरली केवळ, व्यवहार तो पैशापरी ||

दुःख हे विसरूनी जाऊ, विसरु सारे क्लेश |
एकमेका प्रेम देऊ, काढू मनीचे द्वेष ||

जाणुनी तो जन्म आपुला, सार्थ करण्या योग्य |
जाहला मानवजन्म, हेच आपुले भाग्य ||

– रचना : आमोद अ. पाटील

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments