Monday, September 15, 2025
Homeसाहित्यमानवजन्म

मानवजन्म

बोलणे निःशब्द झाले, वागणे ही बदलले |
माणसाचे माणसाशी, नाते सारे संपले ||

जाहला संसार सारा, कोरडा अन् मतलबी |
स्वार्थापायी बदलणे जणू, नवीन त्याची ही खुबी ||

तोलुनी सारीच नाती, केली किंमत बाजारी |
नाती म्हणजे उरली केवळ, व्यवहार तो पैशापरी ||

दुःख हे विसरूनी जाऊ, विसरु सारे क्लेश |
एकमेका प्रेम देऊ, काढू मनीचे द्वेष ||

जाणुनी तो जन्म आपुला, सार्थ करण्या योग्य |
जाहला मानवजन्म, हेच आपुले भाग्य ||

– रचना : आमोद अ. पाटील

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा