Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यारज्जाक शेख सन्मानित

रज्जाक शेख सन्मानित

एनजीओ बोधी ट्री एज्युकेशन फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गागाभट्ट सभागृह एमजीएम औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती श्रीरामपूर येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक तथा साहित्यिक रज्जाकभाई शेख यांना “‘बोधी ट्री एज्युकेशन फौंडेशन राज्यस्तरीय जीवन गौरव’ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. हा कार्यक्रम औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाच्या गागाभट्ट सभागृहात संपन्न झाला. यावेळी त्यांना आकर्षक मानपत्र, जीवन गौरव विशेषांक, पुष्पगुच्छ आणि मानाचा फेटा समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, आरोग्य उपसंचालक धीरज खिरोडकर, आत्माराम बोराडे, डॉ.प्रविण चाबुकस्वार, अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर, बोधी ट्री एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे,  सचिव मीरा वाघमारे, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक शाम रावले आदी मान्यवर उपस्थित होते.

अल्प परिचय
श्री रज्जाक शेख यांनी कोरोनाच्या भयावह काळात आपल्या लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून तीस ते पस्तीस कविता प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली.

‘स्टडी एट होम’ ही संकल्पना राबवताना मुलांना दररोज व्हाट्सएपच्या माध्यमातून घरचा अभ्यास दिला.ज्या मुलांकडे मोबाईल उपलब्ध नाही त्यांना स्वाध्याय पुस्तिका झेरॉक्स करून घरोघरी जाऊन दिल्या आणि शिक्षण प्रक्रिया खंडित राहणार नाही याची दक्षता घेतली .

मेसेजद्वारे ऑनलाईन टेस्ट ,ऑनलाईन अभ्यासाच्या पीडीएफ नित्यनेमाने पालकांपर्यंत पोहोचवल्या. शैक्षणिक विडिओच्या युट्युब लिंक, कवितांच्या लिंक व चित्र पाठवाचन लिंक, स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांना दिल्या. मोफत पाठ्यपुस्तक वाटपचे कार्य शंभर टक्के पूर्ण केले. तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात वाढती लोकसंख्या व त्याचे वातावरणातील ओझोनच्या थरावर होणारे परिणाम या विषयावर मॉडेल बनवून द्वितीय क्रमांक मिळवला. राज्यातील विविध वृत्तपत्रातून “खेळू करू शिकू” या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.

शाळा बंद शिक्षण सुरू काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत ‘काव्यदरबार’ हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यांतर्फे शैक्षणिक कविसंमेलनात दोनदा काव्यसादरीकरणाची संधी मिळाली.

ऑनलाइन विद्यार्थी स्वाध्याय ही संकल्पना अंमलबजावणी केली. भारताच्या अमृत महोत्सव अभियानात तालुकास्तरावर गितगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. राज्यभरातील विविध वृत्तपत्रांमध्ये आपल्या बालकविता व शेतीमातीच्या पंधराशे कविता प्रकाशित केल्या.
जीवन गौरव परिवारातर्फे समाजातील मजूर,वंचित दुर्बल घटकातील, अल्पसंख्याक समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरण केल्या. ह्या सर्व कार्याची दखल घेऊन हा महत्वाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

– टीम एनएसटी. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?