भारतीय संस्कृती व संत साहित्य हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुलाधार आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणु समितीचे अध्यक्ष, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. ते सोलापूर येथील प्रो. डॉ. सुवर्णा गुंड- चव्हाण यांनी संपादित केलेल्या, ‘अमृतकुंभ’ या सुवर्णधनच्या विशेषांकाचे जालना येथे प्रकाशन करताना बोलत होते.
डॉ.मुरलीधर चांदेकर पुढे म्हणाले की, आज विद्यार्थी व समाजासाठी मुलगामी संशोधनाची फार गरज आहे. संत हे मूल्यात्मक जीवनाचा, शिक्षणाचा मुलाधार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो. त्यांना नैतिकतेचं, राष्ट्रीयतेचं, मानवतेचं अधिष्ठान द्यायला मदत होते. यांच हेतूने संतांच्या व भारतीय संस्कृतीतील अलक्षित घटना, स्थळ व संतांचे संशोधन केल्याने ते अलौकिक कार्य लोकांच्या समोर सुवर्णधनच्या,’अमृतकुंभ’ मधुन येते आहे, असेही त्यांनी नमुद केले.
वाचकांच्या जीवनात नक्कीच अमुलाग्र बदल घडतो. शिवाय कोणत्या आचरणातून संत हे नराचा नारायण होतात याचं प्रत्यंतर सुवर्णधनच्या, ‘अमृतकुंभ’ या विशेषांकातून येते, असे मत अध्यक्ष डॉ.प्रदिपजी खेडकर यांनी व्यक्त केले. तसेच डॉ.उपेंद्र कुलकर्णी यांनी प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड – चव्हाण यांनी संपादित केलेल्या, ‘अमृतकुंभ’ या सुवर्णधनच्या विशेषांकाचे स्वागत केले पाहिजे असे सांगितले.

सोलापूरचे सिद्धरामेश्वर, संत सखुबाई, खंडवा येथील दादा धुनीवाले, परभणीचे रंगनाथ महाराज अशा अलक्षित व्यक्तींची चरित्रे वाचायला मिळतात,असे सांगून हा विशेषांक उपयुक्त व संग्रही ठेवावा असा झाला आहे असंही ते म्हणाले.
डॉ. दिनेशजी खेडकर यांनी, ‘अमृतकुंभ’ मधील अलक्षित संतांचा व सुवर्णधनच्या विशेषांकाचे स्वागत करून थोडक्यात सार सांगितले. यामध्ये महामुनी कण्वामुनींचे कार्य, मार्कंडेय ऋषींचे अलौकिक कार्य, रेवणनाथ यांच्या कार्याचं पुनरुज्जीवन, संत सावता माळी यांचा कर्मयोग व त्यांना साथ देणाऱ्या प्रथम शिष्या सौ.जनाबाईं माळी यांचे चरित्र व काव्य, श्री सिद्धेश्वर महाराजांच्या अध्यात्मिक उर्जेचे समाजासाठी उपयोजिता रुढी परंपरांतून निर्माण केलेली व्यवस्था, संत बोलेराम यांची शिवभक्ती, सच्चिदानंद बाबां यांचे कार्य व समाधी, संत सखुबाईची भगवतभक्ती, बीटरगाव येथे प्रती पंढरी उभा करणारे संत राघोजी महाराज, भवानी बाबांचे चरित्र, मध्य प्रदेशातील श्री दादाजी धुलीवाले, रंगनाथ महाराज परभणीकर, परमकृपाळू गिरी महाराज, तपकिरी महाराज, श्री विद्यानंद मुनी, आसाराम महाराज, ॐ मालतीदेवी, भोसले बाबा, रामचंद्र बोधे इत्यादी संशोधनाबरोबरच, भारुड, ओवी, अभंग,गवळण, विराणी इत्यादी काव्यें प्रकाशित केल्याने एक अमौलिक व समाजप्रबोधन करणारा ठेवा जतन करण्याचे कार्य सुवर्णधन करत आहे असे मान्यवरांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी संपादिका प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड – चव्हाण यांनी सातत्याने पुर्ण भारतभरातून हे कार्य कठीण परिस्थितीतसुद्धा आठ- नऊ वर्षे कसे चालू ठेवले आहे ते विषद केले.या कार्याची पोचपावती म्हणून स्वदेशी भारत राज्यस्तरीय पुरस्कार, कोमप.गोवा विशेष सन्मानित, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा आवाजकार मधुकर पाटकरांच्या नावे उत्कृष्ट विशेषांक असे सुवर्णधनला पहिल्या अंकापासूनच बहुमानाचे अनेक पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगितले. तसेच आयोजक असं भा.रा.शै.म.चे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री डॉ. दिलीप अर्जूने यांनी प्रकाशन थाटात आयोजन केले.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी बोलक्या प्रतिक्रिया देत अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एनमुक्ताचे कुलकर्णी सर , प्राचार्य संवर्गातील विविध विद्यापीठातील विविध प्राधिकरणावरील कार्यरत असलेले बहुसंख्य सन्माननीय प्राचार्य, डॉ.प्रफुल्ल गवई, डॉ.चंदू पाखरे, डॉ.गजानन मुंडे, प्राचार्य डॉ शशिकांत तांबे, डॉ.दिपक ननवरे, महाराष्ट्र प्रांताच्या व विविध विद्यापीठांमधील महिला आघाडी प्रमुखा उपस्थित होत्या, यामध्ये डॉ.मिनल ठाकरे, डॉ. दळवी मॅम, डॉ.पौर्णिमा दिवसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800