बानोची कहाणी म्हणजे, त्या सगळ्या असुरक्षित, निरागस मुलींची प्रातिनिधिक जीवन व्यथा आहे ज्या कुठल्यातरी नराधमाच्या अवास्तव गरजांची पूर्ती करण्यासाठी निर्माण झालेल्या, अश्या आयुष्य उध्वस्त करणाऱ्या बाजारपेठेत या बलिकांना आणून पोहचवते.
बानो आणि कित्ती तरी बालिका त्यांचा काहीही दोष नसताना इथे मरणासन्न यातना भोगत आहेत. मानसिक, भावनिक, शारीरिक सगळ्याच स्तरावर प्रत्येक क्षणाला त्यांचं खच्चिकरण होत आहे.
या माता आणि मुलांचा अभ्यास करताना आणि त्यांचं शिक्षण व आरोग्य यावर काम करताना त्यांचा भूतकाळ बघता या माता अगदी सामान्य कुटुंबातून त्यांची फसवणूक करून इथे आणल्या गेल्या आहेत. इथे येण्यापूर्वी त्यांना या वस्तीची किंवा असं कुठलं विश्व असतं याची अजिबात कल्पना नसते. काही मुलींना त्यांच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे कोणी तरी त्याचा गैरफायदा घेऊन त्या कुटुंबाला पैशाचे आमिष दाखवून या मुलींना इथे आणल्या गेलं आहे.
अशी कुटुंब, एकदा आपल्या मुलगी या व्यवसायात पाठवून दिल्या नंतर परत त्यांना आपल्या घरात घेत नाहीत पण त्यांनी कमावलेला पैसा ते वापरत असतात. किंबहुना त्याच मुलीच्या पैशावर ही कुटुंबं पोसली जातात. दुर्दैव हे आहे की जिच्या पैशावर ही कुटुंब जगतात त्याच मुलीला ती या व्यवसायात आहे म्हणून घरात प्रवेश नसतो. कुठल्याही कौटुंबिक समारंभात तिच्याकडे जास्त पैशाची मागणी केली जाते पण तिला त्या समारंभात येण्याची परवानगी नसते.
काही मुलींच्या कुटुंबांनी तर त्यांच्या मुलीचा मृत्यु झाल्याचं देखील जाहीर केलं असतं आणि ते सगळ्या पासून लपवून त्या मुलीच्या पैशाने आपल्या गरजा भागवत असतात.
काय पर्याय असतो मग या मुलींकडे ? त्यांचं स्वतःचं कुटुंब त्यांचा स्वीकार करायला तयार नसतं. अश्या परिस्थितीत या वस्तीत राहून जीवन कंठण्या पलीकडे काहीही उपाय त्यांना दिसत नाही.
बानो ला बाहेरचा रस्ता मिळाला आणि ती जीव मुठीत घेऊन त्या दिशेने पळू लागली. हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यावर तिला आनंदाने रडू आल्याचं ती सांगत होती. बानो ला वाटलं आता ती त्यांच्या तावडीतून सुटली आहे.
ती पुढे म्हणाली, “जिधर रस्ता मिला उधर की तरफ मैं भाग रही थी. कौनसा शहर हैं, क्या जगह है कुछ मालम नहीं था. बस भागी जा रही थी.
मैं सोच रही थी, किसीसे पूछकर अपने गाव चली जाऊंगी. एक चाय की दुकान वाले से पुछा तो पता चला, मैं तो आगरा मे थी ! और यहाँ से मेरा गाव कितनी दूर था, पता नहीं था. पैसे भी नहीं थे. ना कुछ समान था. क्या करू समझ नहीं पा रही थी. आते जाते लोगो से रेल्वे स्टेशन का पता पुछकर उधर के रास्ते पर चल पडी. करिब एक घंटा पैदल चलने के बाद रेल्वे स्टेशन पहूची. एक बार रेल से हम मौसी के घर गये थे. तब मैं बहोत छोटी थी. आती जाती रेल देखती रही. कूछ समय बाद…….
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800