बानो
कान्हा ची सोय व्हावी या उद्देशाने मावशी चे विचार जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थोडी चर्चा केली होती. तसं एखाद्या बालकाला आपल्या घरात ठेवणं ही गोष्टी तितकीशी सोपी नव्हती पण कान्हा आणि त्यांच्या सारख्या इतर मुलासाठी असे उपाय शोधणे आवश्यक होतं. त्यासाठी वस्ती बाहेरील लोकांची मदत घेणं पण जरुरी होतं. या बालकांना कुटुंब म्हणजे काय निदान याचं चित्र दिसणं तरी खूप गरजेचं होतं. या प्रश्नावर तिथे उपलब्ध असणाऱ्या गोष्टी नुसारच निर्णय घ्यावे लागणार होते.
वस्तीतील बालकं शिकू शकतील, त्या वातावरणा पासून थोडं लांब राहू शकतील यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना असा एक विचार आला की, कान्हा फक्त एकटाच नव्हे तर आणखी काही मुलांची व्यवस्था करता येईल का अश्या प्रकारे. जेणे करून त्यांना एकमेकांची साथ मिळेल आणि या मावशी सारख्या इतर कुटुंबाला थोडा आर्थिक आधार देखील मिळेल या माता कडून. पण हे सोपं नव्हतच तरी मुलांच्या भविष्य सुरक्षित होईल आणि त्यांना सामान्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं. माझे प्रयत्न कितपत फळणार माहिती नव्हतं.
कान्हाची आई फार आशेने मला विचारणा करत होती. आज बानो आणि कान्हा ची आई एकत्र भेटल्या. बानो शी बोलताना तिने पण मानलेल्या भय्या भाभी चा उल्लेख केला. मग माझ्या लक्षात आलं अशी काही जिव्हाळ्याची नाती या मातांनी जोडली आहे. कदाचित हे लोक आर्थिक मदतीसाठी या मातांशी जोडत असतील पण त्यात थोड्या फार प्रमाणात प्रेमाचा अंश पण असणार आहे. ज्याचा फायदा या बालकांना होऊ शकेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबात वावरण्याची संधी बालकांना मिळू शकेल. जी त्यांची सगळ्यात मोठी गरज होती. आणि या विषयी आणखी अभ्यास करून आणखी काही कुटुंबाशी भेटून अशी जुळवणुक करता येईल का असे विचार माझ्या मनात घोळत असतानाच बानोची जन्नत आपला सहा माही परीक्षेचा निकाल घेऊन आली. जन्नतला खूप छान मार्क मिळाले होते.
जन्नत, कान्हा अश्या किती तरी बालकांच्या डोळ्यात एक तरी सुखाचं स्वप्न पेरायला हवयं….
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्षा, बाल कल्याण समिती पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800