प्रगती आणि सकारात्मकता साजरी करणे आणि नागरिकांना, विशेषत: तरुणांना रचनात्मक, सर्जनशील आणि दयाळू जीवन शैलीसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने, सकारात्मकतेतील नेतृत्वावरील दुसरी राष्ट्रीय शिखर परिषद नवी दिल्ली येथे नुकतीच झाली.
‘सकारात्मकता आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मकता’ ह्या संकल्पनेवर आधारित या शिखर परिषदेत पॅनेलवरील नामवंत वक्त्यांसह दिवसभरात तीन सत्रे आयोजित करण्यात आली होती.
भारताचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री राम नाथ कोविंद यांनी डॉ मंदाकिनी आमटे असेच डॉ प्रकाश आमटे त्यांच्या परोपकारी कार्यासाठी सकारात्मकतेच्या चळवळीच्या जीवनगौरव पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले, “डॉ. मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे ही सकारात्मकतेच्या वाटचालीची ज्वलंत उदाहरणे आहेत. पुरस्कार विजेत्यांनी ज्या परिसंस्थेसाठी योगदान दिले आहे, त्यांना समृद्ध करत राहावे अशी माझी इच्छा आहे.” ते पुढे म्हणाले की, सकारात्मक आणि आशावादी लोकांमुळे सकारात्मकतेची कल्पना नकारात्मकतेच्या शक्तींवर मात करते.”
या शिखर परिषद आणि पुरस्कारांमागची भूमिका सांगताना, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा “चांगुलपणाची चळवळ” चे जनक डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले की, “सकारात्मकतेची तात्विक प्रेरणा न्याय, समानता आणि स्वातंत्र्य या घटनात्मक मूल्यांमधून मिळते. म्हणून सहानुभूती, आशा, करुणा, कठोर परिश्रम, सचोटी, नवकल्पना, एकमेकांना मदत करणे, विश्वास आणि आत्मविश्वास आणि सुसंवाद निर्माण करणे, असे सकारात्मक गुण विकसित करून साध्य केले पाहिजे.
पहिल्या आवृत्तीत मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “संकल्पनेला खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. सरकारचे प्रकल्प, योजना आणि सेवांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित संस्था आणि व्यक्ती सरकारशी जवळून काम करतात. प्रत्यक्षात ते नागरिकांमधील पूल म्हणून काम करतात. यामुळे अनेक योजना गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकल्या आहेत, जे अन्यथा वंचित राहिले असते.”
आत्मनिर्भर भारत: संकल्प से सिद्धी या विषयावरील पहिल्या सत्राचे अध्यक्ष, एअर मार्शल अजित शंकरराव भोंसले होते. दुसऱ्या सत्रात अमिताभ कांत, माजी सीईओ, नीती आयोग, जी २० शेरापा अध्यक्ष होते.
तिसरे सत्र “नॅशनल बिल्डिंग अहेड” हे मीनाक्षी लेखी, परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाची सांगता राज्यसभेचे उपसभापती, श्री हरिवंश व खासदार तथा आयसिएसारचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या भाषणांनी झाली.
या कार्यक्रमात राष्ट्रीय विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रमुख व्यक्तींना “जेम्स ऑफ इंडिया” पुरस्कार प्रदान करण्यात आले .
विदेशातील भारतीयांना मदत करणाऱ्या “रेडिओ” संस्थेच्या जागतिक व्यवस्थापक धनश्री पाटील यानी आभारप्रदर्शन केले.
या कार्यक्रमास सोसायटी फॉर पॉझिटिव्ह चे अध्यक्ष ऋषिकुमार, उपाध्यक्ष रजत कपूर, ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे अध्यक्ष राज देशमुख तसेच संपूर्ण भारतातून सकारात्मकतेच्या चळवळीवर विश्वास असणा-या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
२०२३ मधील ३ रे शिखर संमेलन मुंबई येथे आयोजित केले जाईल अशी माहिती डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
फारच छान कल्पना…! आपण तरी गुरुकृपाच्या हिम्मत का तरानामध्ये दुसरं काय करतो? सद्भावना जिवंत असलेली, मजबूत मनाची, दिलदार माणसं निर्माण व्हावीत ; यासाठी समाजात सकारात्मक ऊर्जेचे अभिसरण करण्याचा प्रयत्न करतो.
… प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007