Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यविश्व धर्म

विश्व धर्म

टचकन् यावे डोळा पाणी
भेट होता वा आठवणींनी
व्यर्थ होई जीवन आपुले
प्रेम जिव्हाळा अन् आपुलकी वाचुनी

तेव्हाच येई अर्थ जगण्याला
असे कुणी जर अश्रू पुसण्याला
होऊन जाते जगणे सुंदर
जेव्हा कुणी लावतो लळा

आपपर भाव सोडून
लावू आपणही इतरांना लळा
मनुष्य जन्माचे सार्थक होई
फुलविता प्रेम दयेचा मळा

उगाच का जातो कोणी
दिंडीत नाचाया
ओवाळून टाकतो विठाईच्या चरणी
भक्त आपुले मन काया

एकच नाव येते मुखी
पांडुरंग पांडुरंग
कारण कवटाळितो प्रेमे
तो माय बाप पंढरीचा श्रीरंग

त्याचीच लेकरे आपण सारी
गळून पडते जात पात
सांगून गेले ज्ञानदेव
असे विश्वाचे कल्याण त्या मानव धर्मात🙏

– रचना : राजेंद्र वाणी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments