Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यकलियुग

कलियुग

वाट अवघी कंटकांची, रान विषारी फोफावले….
विस्तारा अधिर पिवळे तण हे, एक दुर्वांकूर उगवला पाहिजे !

घोषणा-प्रतिघोषणांचे नगारे, जन मानस हतबल होई….
वृथा वल्गनांच्या कल्लोळात ही, आश्वस्त आवाज पोहोचला पाहीजे !

खुषमस्करे माजले दरबारी अनेक, गोडवी अनाठायी गाती भाट….
टाळूनी दगडे ‘ गंडकी ‘ तली, खरा शालिग्राम वेचला पाहीजे !

अध्यात्म अधिष्ठान आपले जुने, वैराग्य वृत्ती सन्मानलेली….
संस्कृती वरी घाव येता परी, तलवार ही तळपली पाहीजे !

अस्त जाहला त्रेतायुगाचा, पुत्र करी आज्ञा पित्यासी आता….
राम कृष्ण ही झाले स्तंभित म्हणे, नव्याने कृष्णनीती रचली पाहीजे !

— रचना : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. सद्य परिस्थिती मांडणारी कविता. उत्कृष्ठ शब्दांकन. दुर्वांकुर उगवलाच पाहिजे. तलवार सुध्दा तळपलीच पाहिजे.
    असेच सुंदर लिहीत रहा.

    मनोज पटेल – ठाणे

  2. तलवार ही तळपली पाहिजे
    उत्साह व स्फुरती वाढवणारी कविता

    अभिनंदन सरजी

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८