आपली बालके ही फक्त आपलीच नसतात. तर ते देशाचे भावी नागरिक असतात. पुढे देश तेच चालवणार असतात. म्हणून ते सर्वार्थाने सशक्त होण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे हे सांगताहेत जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ हेमंत जोशी.
— संपादक
आपल्या पुढची पिढी जास्त उंच, बळकट, हुशार, निरोगी करण्यासाठी आपण पुढील माहिती काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे कार्यवाही करीत रहाल, अशी अपेक्षा आहे.
प्रिशा पियूष 6 महिन्या ची झाली. तिचा वाढदिवस झाला. वर्षा आजीने व प्रिशाच्या आई बाबांनी फळांचा केक केला. फोटो बघा. त्यांचे अभिनंदन. आपण सर्वांनी असे करावे.

मुलांना विषारी चहा, कॉफी, बिस्कीट ऐवजी आरोग्यदायी अमृत ताक व फळे नेहमी द्यावी.
मुले 18 वर्षे वाढतात. तोपर्यंत आपल्या सर्व मुलांचा आपण दर 6 महिन्यांनी वाढदिवस करावा.
त्यादिवशी मुलामुलींचा उंची, वजन, डोक्याचा घेर मोजावा. त्यांच्या वाढीचा आलेख कागदावर काढावा. याने बाळ चांगले वाढते आहे हे आपल्याला दिसेल. बाळ जास्त उंच, दणकट, हुशार व निरोगी होईल. या दिवशी सर्व लसी द्याव्या.
बाळ 6 महिन्याचे झाले की त्याला मांडीवर बसवून घरच्या मऊ वस्तू चाटवाव्या. ओठांना लावाव्या. यालाच उष्टावण संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे सं + कार. सं म्हणजे चांगले. कार म्हणजे काम. संस्कार म्हणजे चांगले काम. आपले 16 संस्कार आहे. त्यातील उष्टावण हा एक आहे. तो सर्वांना बोलावून छान करावा. यावेळी बाळाला मऊ वरण भात तूप तेल टाकून द्या. उपमा, शिरा, केळी, चिकू, पपई, आंबा द्या. हळूहळू त्यात भाजी, कोशिंबीर टाका.
आपले सर्व अन्न द्या. मऊ अंडे, मास मासळी द्या. आईचे दूध मिसळून दिलेले अन्न व औषध मुले जास्त चांगली घेतात. यानंतर दरवेळी अन्न दिल्यावर आईचे दूध द्यावे. पहिले वर्षाच्या वाढदिवसापर्यंत मुले घराचे सर्व अन्न खातात. आईचे दूध २ वर्षे द्यावे. खाली ठेवलेले अन्न पाणी मुले तोंड लावून खातात पितात. त्यांना आपल्या हाताने खाऊ पिऊ द्यावे. सांडू द्यावे. वाकड्या चमचातून सांडेल असे अन्न नको. त्यात अन्न कमी व पाणी फार असते. 100 मिली लिटर दुधात 90 मिली पाणी असते. दूध पाणी म्हणून द्या. अन्न म्हणून देवू नका. पातळ अन्नानेच मुले बारीक होतात.
50 रु किलो चा तांदूळ आपण बाल अन्न म्हणून 1000 रुपये किलोने घेतो. गरीब होतो. हे पाप करू नका. दुधा पेक्षा दही द्या. त्याने ब-१२ जीवनसत्त्व जास्त मिळते. हे आपल्याला लागते. हे आपल्या सर्वात कमी आहे. आपण सर्वांनी वाटी भर दही रोज खावे. हे कुणाला माहिती नाही. म्हणून आज 10 पैकी 9 मुले पहिल्या वाढदिवसाला बारीक होतात. याने मेंदू ची पण हानी होते. ती नंतर भरून निघत नाही. ही माहिती देऊन आपण आज आत्ता तात्काळ ते बदलू या.
मुलांच्या कपड्यांना खिसा असावा. तो नेहमी मुरमुरे, डाळ्या चणे दाणे बोरे आवळे चिंचा आदी खाऊने भरलेले हवा. भरल्या खिशाची मुले नेहमी अंगात छान भरलेली असतात. इतर बारीक असतात. हे जाड मुलांसाठी नाही.
घराच्या एका कोपऱ्याला खाऊ कोपरा म्हणावे. त्यात 18 वर्षे सर्व वेळ बाळासाठी खाऊ पाणी असावे. आमच्या सांगण्यावरून असा खाऊ कोपरा अंगणवाडीत असतो.
असे खाणारी मुले दणकट होतात. जास्त उंच व जास्त हुशार होतात. आजारी पडत नाही. मरत नाही. असा हा अमर मंत्र आहे. अमृत मंत्र आहे.

हे मी जबाबदारीने सांगत आहे. सर्व जग आमचे ऐकते. 6 महिन्याचा बाळंतपणाच्या रजेचा कायदा आम्ही सुचवल्यावर जगभर झाला.
ही माहिती सर्वांना सांगा. शेअर करा. ही सर्वोत्तम देश सेवा आहे. याने सर्व मुले जास्त चांगली होतील. देश चांगला होईल. आपली मुले जगावर राज्य करतील.
आपण हे केले नाही व आपल्या लोकांची मुले खराब झाली असे होऊ नये.
हे सर्व भाषांत भाषांतर करून 150 कोटी भारतीयांपर्यंत पोचवायला मदत करा.
वामनाने एक पायात जग व्यापले. तसे या माहितीला देश व्यापायला मदत करा.

— लेखन : डॉक्टर हेमंत जोशी. विरार (पश्चिम)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
डाॅ. जोशी नेहमीच सकारात्मकता पसरतात. त्यांचे लेख मला आवडतात. काहीतरी शिकायला मिळते.
आजच्या पालकांसाठी उपयुक्त लेख.