भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्या निमित्ताने ही कविता. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
बाबासाहेब तुम्ही होता म्हणुन
चवदार तळ्याचे पाणी मिळाले
दीन दलितांचे हक्क त्यांना
तुमच्यामुळेच तर मिळाले ॥ १ ॥
पाणी म्हणजे जीवन आहे
दीन दलितांना ते मिळत नव्हते
हक्क त्यांचा हिरावला होता
बाबासाहेब तुमच्यामुळे पाणी मुक्त झाले ॥ २ ॥
चवदार तळ्याचा सत्याग्रह
स्वाभिमान अन अस्मितेचा
गोरगरिबाला पाणी मिळाले
इतिहास झाला सत्याग्रहाचा ॥३॥
बाबासाहेब तुम्ही होतात
म्हणुन झाला हा लढा
मुक्त झाले अंगण दीनदुबळांचे
सत्याग्रहाचा हा यशस्वी लढा ॥ ४ ॥
प्रज्ञा शिल करुणेचा सागर तुम्ही
चवदार तळ्याचे सत्याग्रही तुम्ही
मानवते पुजारी आणि मानवतावादी तुम्ही
दीनदुबळे दलितांचे उध्दारक तुम्ही ॥ ५ ॥
पाण्यावर हक्क ना कोणाचा
सर्वांसाठी ते खुले असावे
चवदार तळ्यांवर सत्याग्रह
संघर्ष शिकवला दिनदलितांना

— रचना : पंकज काटकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ ☎️ 9869484800
