कोकणातल्या स्वर्गाक,
वैभवात सजवतय,
हिरव्यागार शालीत,
गावांक वसवतय ।
वाट बगून थकलंय,
जागे आता होश्याल,
पापान घडो भरल्यान,
दोष कोनाक दीश्याल ।
इकासाच्या नावाखाली,
डोंगरांग पोकरतास,
रस्त्यांच्या कामाखाली,
मातयेक खनतास ।
पूल उबारून,
नदयांक उपसतास,
पिलर बांदून,
पानयाक अडवतास ।
सुरंग लावन,
जमनिक हलवतास,
मशनी रुतवन,
धरनीक घुसळतास ।
जंगला तोडून,
माळराना केलास,
निसर्गाक इसरून,
इमारती बांदलास ।
गाडयेंच्या गरदेन,
झाडाझुडपा चिराडली,
तापमान बिगडून,
प्रदूषना वाडली ।
डोंगर दरे पोकरून,
इटंबना केलास,
चिपी तोडून,
नद्यांक पळवलास ।
हऱ्याभऱ्या निसर्गाक,
ईद्रुप केलास,
निसर्गाच्या वैभवाक,
ओरबाडून टाकलास ।
दरवरसाक बरसतय,
निमूट मार्गान जातय,
मानवाच्या अतिरेकान,
वाट माजी शोदतय ।
नायलाज झालो,
वाट चुकली,
अनर्थ घडलो,
गावा बुडली ।
डोंगरांच्या कुशीत,
झाडांक जगवया,
गावातल्या जीवनात,
पावसाक भेटूया ।

– रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल.
अगदी सत्य परिस्तिथी कथन केली, खूप सुंदर कविता
धन्यवाद!🙏
पावस व्यथा एक वास्तव चित्रण
धन्यवाद!