परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांची २०० वी जयंती महोत्सव व १०० व्या पुण्यतिथी महोत्सवी वर्षानिमित्त श्री अनिल नागपूरकर यांच्या सहकार्याने श्री बापू पारसे यांनी दान दिलेल्या जागेत जन्मभूमी आर्वी येथे मंदिर बांधण्यात आले. दहेगाव मुस्तफा येथे साधना मंदिर तसेच वरखेड येथे प.पू.मंजुळा माता स्मारक गावकऱ्यांचे सहकार्याने मंजुळा वाहिनी नदीत बांधण्यात आले. तसेच वरखेड येथील मंदिराचे सुशोभीकरण श्री दिवाकरराव दळवी, नागपूर व घनश्यामजी मुंदडा, तळेगाव यांच्या सहकार्याने मंदिर सजावट करून या कोरोना महामारीत सर्व नियमांचे पालन करून दि.१२ ते १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना, भजन, प्रवचने घेऊन १०० वी पुण्यतिथी वरखेड येथे संपन्न होत आहे.
आज जगात अशा प्रकारचे उदाहरण आपणास मिळणार नाही ज्यांचा जन्म दिन व समाधी दिन एकाच वेळी साजरा केला जातो. म्हणूनच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात- “श्रीगुरु आडकुजी चरणांचे, कितीतरी तरले, पुढे ही तरतील, कलियुगी हाची धर्म, तरेल तो धुळीच लावील!”___
परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांचा जन्म संतभूमी आर्वी जि.वर्धा येथे कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेला मंगळवारी दुपारी बारा वाजता
श्री सीतारामजी फिसके व माता काशीबाई फिसके यांच्या उदरी १४-११-१८२१ ला पूर्वीच्या माळगण वार्डात (आताचा मायबाई वार्ड) येथे झाला.
आर्वी तसे वर्धा जिल्ह्यातील व्यावसायिक शहर. परंतु इथे अनेक संत होऊन गेले. संत जमनादास महाराज, संत झामसिंग महाराज, संत अवघडनाथ महाराज, संत बाबा महाराज, संत पांडुरंग महाराज, संत गुरूजी यांच्याच नावाने तिथे वार्ड ओळखल्या जातात.
आडकुजी महाराजांची आई लहानपणीच वारली. पुढे वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले “लग्न होऊनी नग्न जाहले, ही ग्वाही देती पुरातन भले !
त्यांचा “इ.स.१८२१ ते १८६१ पर्यंतचा काळ आर्वीत तर इ.स.१८६१ ते १८८५ पर्यतंचा काळ दहेगाव मुस्तफा येथे गेला. त्यांची पंचवीस वर्षे खान बहादुर महमंद गुलाम मुस्तफा यांच्या घरी गेली.
आडकुजी महाराज दहेगावात वेड्या सारखे भटकत, फिरत. तेथील कोंडीबा रोहनकर हा व्यसनी-दुराचारी होता. पुढे तो आडकुजी महाराज यांच्या प्रभावाने सात्विक भक्त झाला. मालगुजार गुलाब मुस्तफा यांना शिकार करण्याचा मोठा नाद होता. तो दाट जंगलात जावून हरिण, अस्वल, वाघ श्वापदांची शिकार करीत असे.
एकदिवस शिकारी करिता जात असतांना घोर संकट आले. जंगलात जाता बरोबर वाघ अंगावर आला. अंगावर काटा उभा झाला. तर आडकुजी बाबांची आठवण झाली. घरी गेल्यावर महाराज म्हणाले,
“मुस्तफा आली होती काणी आफत आजही तिथे” गुलाम मुस्तफा यांना दोन पत्नी नुरबेगम व वजीराबेगम होत्या. महाराज तिला आईसाहेब, बडीअम्मा अशा नावाने नुरबेगमला म्हणू लागले. आजही तिथे कबर समाधी आहे. सर्व धर्मातील हजारो लोक दर्शनासाठी जातात. आडकुजी महाराज यांच्या कृपेने आज गाव आडकुजीमय झाले आहे.
!! वय चौसष्ट वर्षाचे, आले वरखेडी साचे !!
इ.स.१८८५ मध्ये परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज वयाच्या चौसष्टाव्या वर्षी दहेगाव मुस्तफा वरून जन्म भूमी आर्वी व नंतर लगेच वरखेड गावात आले. सर्व प्रथम आमराईत राहिले.त्यावेळी डोक्यावर पागोटे, अंगात बारकसी, धोतर परिधान केले होते. खांद्यावर घोंगडी, विहीरीचे पाणी काढण्यासाठी दोरी त्यावेळी गावातील “बाबा, बाबा ! त्यांच्या जवळ जावू लागले. त्यांना भाकरी, भाजी आणून देऊ लागले. बाबा ! मौनात राहायचे. नंतर मात्र अंगावर कपडा ठेवणे बंद केले. त्यांना विरक्त अवस्था प्राप्त झाली. पशुपक्षावर खुप प्रेम केले. हनुमानजीच्या पारावर राहू लागले. प्रथम जानरावजी बोके व नंतर शामरावजी बोके यांच्या खोलीत राहू लागले. परमपूज्य मंजुळा मातेचे भाऊ तुकारामजी वानखेडे स्वतः आडकुजी महाराज यांच्या सेवेत होते. त्यावेळी बाल मंजुळा सोबत जात असे.
पुढे मंजुळेचा विवाह यावली येथील बंडोपंत इंगळे (ठाकूर) यांच्याशी झाला. परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांच्या कृपाप्रसादाने ३० एप्रिल १९०९ रोजी युगप्रवर्तक विश्वसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला. जेव्हा इ.स.१९१० साली शेगावचे गजानन महाराज समाधीस्त झाले तेव्हा “अरे हात गेला, अरे हात गेला !” असे म्हणाले.
इ.स.१९१८ मध्ये संत साईबाबा गेले त्यावेळी बेचैन होते. पोट बडवित होते….
!!! शिर्डीत बंधू माझा,म्हणे आडकुजी !!!….. महाराष्ट्रातील संतांची ओळख व संबंध महाकवी, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या भजनाव्दारे लक्षात येते. “शिर्डीत बंधू माझा म्हणे आडकुजी!दुजा भाऊ शेगावात, नांदतो अजी!धु.! तिला ताजुदिन अमुचा, मित्र जीव-भावसाचा, मुंगसाजी ! बंधु चवथा, आमुच्याभुजी !१! साईखेडचाची दादा, आमुचाची बंधु राजा ! खटेस्वराची ही ! माझी संगती गुजी !२! मायबाई!माता माझी, सर्वांभूती पान्हा पाजी !म्हणे दास तुकड्या याची भक्ती ना दुजी !३! या भजनावरून संतांचा संबंध लक्षात येते.
आडकुजी महाराज शंभर वर्षापैकी फक्त छत्तीस वर्ष वरखेड भूमीत राहिले. त्यावेळी हजारों सेवकांनी त्यांची सेवा केली. इ.स.१९२० ते १९२३ पर्यंत प्राथमिक शिक्षण राष्ट्रसंतानी घेतले. सोबतच आडकुजी महाराज यांच्या बालपणी सहवासात राहिले.
पुढे साधक तपस्वी योगमुणी संत लहानुजी महाराज, संत सत्यदेव महाराज यांनाही आडकुजींचा गुरूप्रसाद प्राप्त झाला. या कलियुगात समाजातील अज्ञानी जीवाला तरून जाण्याचे तत्त्वज्ञान हा बाल तुकड्याच देवू शकतो याची जाणीव गुरू महाराज यांना झाली होती. महा तुकड्या, महा तुकड्या म्हणून संबोधू लागले. त्यावेळी तुकडोजी महाराज यांचे वय अवघे बारा वर्षाचे होते. पुढे परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेला, मंगळवारी १४-११-१९२१ रोजी दुपारी १२ वाजता समाधीस्त झाले.
आडकुजी महाराज यांची संपूर्ण वरखेड गावातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यांना समाधीत ठेवले. वरखेडचे श्रीमंत दादासाहेब बोके यांनी व्यवस्था केली. त्यावेळचे सेवक गोविंदराव वानखेडे, भगवान दशमुखे, मोतीरामजी बेलूरकर, गणपत बोके, दादुजी बोके, दौलतराव बेलूरकर, रामचंद्र बेलूरकर, महादेव बेलूरकर, दौलतराव कडू, जानरावजी बोके, रामकृष्ण बोके, पांडुरंग अग्रवाल या सारख्या अनेक मंडळींनी गुरू महाराजांची सेवा केली.
नेत्र उघडले बाळ तुकड्याला पाहिले. “तुकड्या दास म्हणे, भरणी पाहिला जीवंतसा!”…..
पुढे आडकुजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले असता गावचे लोक म्हणाले, दहा वर्ष झालीत तरी समाधीचे बांधकाम पडूनच आहे. ते ऐकून तुकडोजी महाराज यांना दु:ख झाले. इ.स.१९२९ ते १९३४ अशा पाच वर्षात संत रामजी महाराज, बग्गी जावरा यांच्या शुभहस्ते करण्यात आले आणि बांधकाम स्वतः करून घेतले.स्वत: जमीन, जागा, शेती मिळवून आडकुजी महाराज संस्थान, वरखेड रजिस्ट्रेशन करून इ.स.१९५३ साली कमेटीच्या स्वाधीन केले.
“राष्ट्रसंताचे-गुरूदेव”..
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सेवेत राहिल्याने “गुरूकुपा झाली, इमारत फळा आली” परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांचे जीवन चरित्र लेखन करण्याचा मान व पुढे इ.स.११-१०-१९६८ ला गुरूमाऊली राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देह सोडून गेल्यावर विश्वस्त म्हणून श्री रामकृष्णदादा बेलूरकर, यांना मिळाला.
परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांचा एकशे एकसष्टी महोत्सव भव्य दिव्य प्रमाणात
११-११-१९८१ वरखेड नगरीत साजरा करण्यात आला. विमानाने पुष्पवृष्टी करण्यात आली. मराठी संगीतकार राम लक्ष्मण यांचा कार्यक्रम घेण्यात आला.
परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराजांना विनम्र अभिवादन🙏
– लेखन : माणिकदास बेलूरकर
संत साहित्य अभ्यासक, श्रीक्षेत्र वरखेड, ता.तिवसा. जि.अमरावती पिन ४४४९०६
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800