Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यानवी मुंबई पर्यावरण : संयुक्त प्रयत्न आवश्यक

नवी मुंबई पर्यावरण : संयुक्त प्रयत्न आवश्यक

नवी मुंबईतील पर्यावरणाचा ऱ्हास ताबडतोब थांबविण्याच्या गरजेवर हरीत समुहांनी दिला भर असून शहराच्या हवामान कृती आरखड्यावर काम करण्याची तयारी विकासकांनी दाखवली आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शनिवारी रात्री ‘बॅलन्सिंग डेव्हलपमेंट विथ एनव्हायर्नमेंट’ (पर्यावरणासह विकासाचे संतुलन) या विषयावर झालेल्या चर्चासत्रात दोन्ही बाजूंच्या स्पष्ट भूमिका ऐकून घेण्यात आल्या.

धोरण आराखडा तयार करण्यासोबत सिडको आणि एमएमआरडीए सारख्या सरकारी एजन्सींचा हवामान नियंत्रण विकास आरखड्यात सहभाग करून घेण्यासाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे ठरले.

या चर्चासत्राचे आयोजन नाटकनेक्ट फाऊंडेशन, नवी मुंबई फर्स्ट आणि क्रेडाई एमसीएचआय युथ यांच्यावतीने नवी मुंबई मर्चंटस् जिमखाना येथे नुकतेच करण्यात आले होते.

नवी मुंबई हे एक नियोजित शहर असल्याचा पुनरुच्चार नाटकनेक्ट फाऊंडेशनच्या संचालकांनी केला.
50 वर्षांपूर्वी या दिशेने चांगली सुरुवात झाली होती मात्र आजच्या तारखेत या नियोजनकाराला मूळ उद्दिष्टाचा विसर पडलेला असून निसर्ग संवर्धन, प्रामुख्याने कांदळवने आणि पाणथळ जतनाकडे दुर्लक्ष होताना दिसते. पायाभूत प्रकल्पांसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदन क्षेत्रांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कांदळवनांची कत्तल आणि पाणथळ बुजवल्याने उरण पट्ट्यात पूरस्थिती निर्माण होण्यासाठी जबाबदार असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर कुमार यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.

सध्या बऱ्याच प्रकल्पांनी पर्जन्यजल साठवणे, सौर ऊर्जा आणि कचरा पुनर्चक्रणावर लक्ष केंद्रित केले आहे. विकासक समुदाय हा पर्यावरण-विरोधी असल्याची प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नवी मुंबई फर्स्टचे अध्यक्ष राजेश प्रजापती यांनी सांगितले. “कांदळवने आणि पाणथळीचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण गटांसोबत काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत,” असेही प्रजापती म्हणाले. ते क्रेडाई एमसीएचआय रायगडचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

“जेएनपीटी, एनएमएसईझेड आणि सिडको या सर्व प्रकल्प समर्थकांकडून पर्यावरणावर होणारे विनाशकारी परिणाम दुर्लक्षित होत आहेत,” असा इशारा श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी दिला. दलदलीचे प्रदेश आणि पाणथळ यांसारख्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून त्यामुळे केवळ भरतीच्या जलप्रवाहावर परिणाम होत नसून मच्छिमार समुदायाच्या दैनंदिनी आणि रोजगारावर परिणाम होत असल्याचे, ते म्हणाले. पवार हे नियमभंगाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढले आहेत. खाडी आणि पाणथळ प्रदेशातून वाहणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप केल्याने उरणमधील गावांत निर्माण होणाऱ्या बिगरमोसमी पुराकडे त्यांनी लक्ष वेधले.

दीप राजपाल हे क्रेडाई एमसीएचआय-उरण द्रोणागिरीचे अध्यक्ष असून कामाची सुरुवात केल्यानंतर बदललेल्या सीआरझेड नियमांचा परिणाम काही रियल इस्टेट प्रकल्पांवर झाला असून हे प्रकल्प आता भोगवटा प्रमाणपत्रांसाठी झगडत आहेत. नवी मुंबईच्या विकासाकरिता आपल्या जमिनी देणाऱ्या प्रकल्प-बाधितांसाठी भरपाईपोटी देण्यात आलेल्या घरांच्या इमारती या प्लॉटवर उभारण्यात येत आहेत.

क्रेडाई एमसीएचआय युथचे अध्यक्ष इस्रायल शेख म्हणाले की, सामान्यपणे विकासक हे स्थानिक नियोजन पाहणाऱ्या एजन्सीवर अवलंबून असतात. पर्यावरणाशी संबंधित सर्व पैलू सुस्पष्ट असतील असे ते गृहीत धरतात. प्रकल्पाला प्रारंभ प्रमाणपत्र (CC) जारी केल्यानंतर एखादी पर्यावरणाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास विकसकाला का जबाबदार धरण्यात येते ? पर्यावरणाच्या दिशेने सर्वच सहयोगीनी काम करण्याच्या गरजेकरिता हीच योग्य वेळ आहे यावर शेख यांनी जोर दिला.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे अनेक डोंगर सपाट करण्यात येत आहेत, कांदळवनांची कत्तल सुरू आहे आणि तीन नद्यांचे मार्ग वळवले जात आहेत. या पर्यावरण-विरोधी कामाला किती विकासकांनी विरोध दर्शवला असा प्रश्न खारघर येथील पर्यावरण कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी विचारला आहे. एखाद्या प्रकल्पावर काम सुरू करण्यापूर्वी सर्व पर्यावरण पैलू लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

जयश्री कुरूप यांनी चर्चेची सुरुवात करताना म्हटले, नवी मुंबई हे इतर शहरांच्या तुलनेत सुनियोजित शहर असल्याने हवामन कृती आराखड्यावर काम करण्यासाठी चांगले आहे. वाद घालण्यापेक्षा सर्व सहयोगी घटकांनी एकत्र येऊन शाश्वत कार्यक्रमावर काम करावे आणि शून्य कार्बन उत्सर्जनाच्या देशाच्या उद्दिष्टात योगदान द्यावे.
जयश्री कुरूप यांनी सूत्र संचलनही केले.

– टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?