आता तुम्ही म्हणाल की, “कान” होऊ या म्हणजे काय ? तर माणसात राहण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. माणसात राहण्यासाठी संवाद होणे आवश्यक आहे. तो संवाद हवा तर एकमेकांचे ऐकून घेणेही महत्वाचे आहे. या अर्थाने मी एकमेकांचे कान होऊ या असे म्हटले आहे.
सगळीकडे आपण पहात आहोत की प्रत्येकाला काही न काही सांगायचे असते, पण कोणालाच इतका वेळ नसतो. मग माणूस मनातल्या मनातच ते ठेवून देतो आणि ती विचारांची उतरंड वाढत जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे, समुपदेशकाकडे जाणे हा होय.
हे का होते ? तर माणूस समाज प्रिय आहे. त्याला आपल्या आजूबाजूला माणसं हवी असतात. आणि त्यातून त्यांनी आपल म्हणणं ऐकावं असही वाटतं असत. पण मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न जरूर विचारावा की आपण कोणासाठी किती वेळ काढतो ? आपण समोरच्याचे खरच मन लावून ऐकतो का ? मैत्रिणीला मित्राला आपल्याला खूप काही सांगायचं असत पण फोनवर फक्त “हां आणखी काय विशेष”? ह्याच्या पुढे संभाषणाची गाडी जात नाही. कारण पलीकडच्या व्यक्तीला विश्वास नसतो की खरच आपल म्हणणं ऐकण्यासाठी हा कान आसुसला आहे.
हा कान का महत्वाचा आहे ते सांगते.
मी जेव्हा एम ए ला प्रवेश घेतला (तसा मी खूपच उशिरा प्रवेश घेतला म्हणजे वयाच्या ६०व्या वर्षी !) तेव्हा महाविद्यालयात माझ्या बरोबर वयाच्या ३० ते ४० वर्ष पर्यंतच्या मुली होत्या. सगळ्या लग्न झालेल्या. खूप वर्षांनी महाविद्यालयात पुन्हा यायला मिळालं म्हणून खूप आनंदित झालेल्या. त्यांना एकमेकींशी किती बोलू आणि किती नाही असं व्हायचं. पण सगळ एकाच आणि पहिल्याच भेटीत नाही न सांगता येत. मी हे सगळ दुरून बघत होते. कधी त्यांच्या संभाषणात भाग ही घेत होते. पण दिवस एक मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, “ताई चला न कॅन्टीन मधे चहा घ्यायला जाऊ या”. मला माहित नाही तिने एकदम मलाच का म्हणावं चहाला चला म्हणून ? मी पण लगेच चल म्हणले.काहीही आढेवेढे न घेता मी हो म्हणण्याचा तिला इतका आनंद झाला होता म्हणून सांगू. आणि चहाचा पाहिला घोट घेतला बरोबर ती जे सुरू झाली तिच्या आयुष्य बद्दल सांगायला. तिच्या घरच्या अडचणी, तिचे प्रश्न, तिच्या आकांक्षा, स्वप्न या सगळ्या बद्दल ती भरभरून बोलत होती. मी नुसते तिच्या कडे हसून बघत होते, मधूनमधून तिला प्रोत्साहन देत होते. तिला अस वाटलच नाही की या ताईं ची आणि आपली फार थोड्या दिवसांची ओळख आहे.
तिच्यासाठी त्यादिवशी मी तीचा ऐकणारा कान झाले होते. त्या नंतर ती नेहमी माझ्याशी बोलायची अगदी भरभरून बोलत असे. त्यानंतर ती मला कधीच दुःखी कष्टी, अबोल अशी दिसलीच नाही. कारण तिच्यासाठी मी तिचा हक्काचा कान झाले आहे तेव्हा मला वाटलं की मी एक जीव मनाच्या अंधारात जाण्यापासून वाचवला.
मला वाटतं की माणसाने सगळच सांगू नये समोरच्याला पण ज्या वेळेस आपल्याला आतून वाटत असतं की कोणाजवळ तरी आपल मन मोकळं करायला पाहिजे तेव्हा अशी व्यक्ती आधी पासूनच आपल्या संग्रही ठेवायची असते म्हणजे आयुष्यात कधीच मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता वाटत नाही. कान सगळ्यांनाच असतात पण जेव्हा आपण म्हणतो की, “जीवाचे कान करून मी ते ऐकलं” असं जेव्हा होतं तेव्हा ते कान खऱ्या अर्थाने कान होतात. कारण त्या कानातून समोरच्याने सांगितलेले आपल्या काळजा पर्यन्त पोहोचलेले असते. त्याच्या भावना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं कुणीतरी कान देऊन ऐकलं ह्याचा आनंद खूप काही सांगून जातो. आणि पुढच्या वेळेस जर तशी परिस्थिती आली तर त्याला त्या भावना, लढण्याचं बळ देऊन जातात.
या साठी कोणाचे तरी ऐकण्यासाठी आपण कान व्हावं, म्हणजे कौन्सिलर कडची रांग कमी होईल, आत्महत्या कमी होतील. कोणाचीतरी जीवनाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येईल आणि तो तुम्हाला काळजापासून दुवा देईल आणि एक जीव वाचवल्याचं समाधान आणि पुण्य तुम्हाला लाभल्या शिवाय राहणार नाही. आपल्या आजू बाजूला आजच्या परिस्थितीत खूप जण असे भेटतील तुम्हाला. सध्या तरुण मुलामुलींचे jobs गेलेत त्यामुळेही ही मुलं भरकटल्यासारखी झाली आहेत.
तर, चला मग आपण एकमेकांचे ऐकणारे कान होऊ या. सल्ले देणारे खूप असतात,पण मनापासून आपलं म्हणणं ऐकणारे खूप कमी असतात.हो ना ?
तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा….

– लेखन : सौ. अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
सुदंर विषय आहे, मनमोकळ ऐकणारे कान होऊ या, विश्वासाने ऐकून हूकांर देत देत बोलणाऱ्या च्या
सुख दुःखाच्या भावनाना प्रेमानी फूकंर घालायला शिकू या.
एकेकटी लोकं, वयस्कर लोकं ह्याचे कान होऊ या. मोकंळ बोलण्याचा त्यांना मनमोकळा आनंद देऊ या.कान होणं खूप जरूरीचे आहे. कित्येक लोकं एकटी राहतात कुणाशी बोलायचं बोलायलाच कूणी नाही अशी खंत करणारे खूप लोक आजूबाजूला असतात त्याचे फक्त मनापासून ऐकणारे कान होऊ या.
खरंच असे असण्याची खूप गरज आहे,कोणीतरी आपले महणणे ऐकून घेतेय , म्हटल्यावर त्या वयक्तीचे समाधान होते.मनावरचे दडपण कमी होते,माणूस रिलॅक्स होतो.अर्चना ताई खूप छान लेख लिहला आहे.
कान होउया …फार सुंदर ऊपयुक्त विचारांचा लेख.
one should be a patient listener…हे किती योग्य आहे.
खरोखरच आजकाल असे समृद्ध करणारे संवाद उरले नाहीत.
जो तो आपल्याच वर्तुळात .आपल्याच विश्वात…समाजसौख्य हरवले आहे…
अगदी खरी गोष्ट, अर्चनाताई!
….प्रशांत थोरात , पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
अगदी खरंय
आता संवेदनशील ता संपुन एकाकीपण वाढत चालला त्याचं सहजसोप्या रितीने आपण लिहिले कारण आता कोणीही कोणाचा कान तयार व्हायला तयारच नाही