Thursday, June 19, 2025
Homeलेखन्यूज स्टोरी टुडे आणि मी

न्यूज स्टोरी टुडे आणि मी

नमस्कार, वाचक हो.
न्यूज स्टोरी टुडे च्या तिसऱ्या वर्धापनदिना निमित्त आदरणीय देवेंद्र भुजबळ सर आणि सौ. अलका ताई यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

तसे माझी “केरळ दर्शन” लेखमाला संपल्यानंतरही कविता आणि लेखांच्या निमित्ताने आपण भेटत असतोच. पण विशेष म्हणजे याच महिन्यात न्यूज स्टोरी टुडे सोबत मला बरोबर दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.
न्यूज स्टोरी टुडे चा तिसरा वर्धापन दिन मनोगताच्या माध्यमातून साजरा करण्याची मला मिळालेली ही सुवर्ण संधी आहे.

जुलै २०२१ मध्ये साकव्यचे मा. विलास कुलकर्णी सरांकडून भुजबळ सरांची ओळख झाली. देश विदेशात वाचल्या जाणाऱ्या या पोर्टल वरती माझी “पायवाट” ही पहिली रचना प्रसिद्धीस आली आणि माझा पोर्टलबरोबर रमणीय प्रवास सुरु झाला.

त्यानंतर भुजबळ सरांनी मला लेख लिहायला प्रोत्साहन दिले. खरं तर तेव्हा मी लेख लिहीत नव्हती. चारोळ्या, कविता, कथा वगैरे लिहायची. (गंमत म्हणजे मला अजूनही चारोळ्या लिहिते म्हणून काहीजण नावे ठेवतात 😂)
पण सरांनी “आम्ही पालघाटकर” या विषयावर लिहायला सांगितले.

काहीजण मनापासून प्रेरणा देणारे असतात. एखाद्याचे अंगभूत गुण बाहेर काढणे ही मोठी कला आहे आणि ही कला, हा गुण प्रत्येकाकडे नसतो.
नावं ठेवणे, हिणवणे, दुजाभाव हे बऱ्याच ठिकाणी आपणाला अनुभवण्यास मिळते. पण एखाद्याला प्रोत्साहन देऊन त्याकडून चांगले कार्य करून घेणारे कमीच असतात.

आ. भुजबळ सरांनी लेख लिहिण्याबद्दल दिलेला विश्वास हा माझ्यासाठी निर्णायक टप्पा ठरला आणि मी लेख लिहायला सुरुवात केली. ‘आम्ही पालघाटकर’ नंतर केरळ दर्शन सुरु झाले. यावरती वाचकांचे अभिप्राय यायचे. काही अभिप्राय वाचक लिहितात मधून तर काहीजण वैयक्तिकही अभिप्राय द्यायचे.
कोण केरळला फिरायला येऊन गेलेले सांगायचे. तर कोण केरळ नक्की बघणार हे म्हणून सांगायचे.

इतकंच नाही तर काही ऋणानुबंध असे जुळले गेले की अजूनही वरचेवर बोलणे होत असते. यातून एक गोष्ट मात्र शिकायला मिळाली.. एखाद्यासाठी किती काही केले तरी त्यांचे समाधान होत नसते पण काही घेणे देणे नसले तरी मनापासून नाती जोडली जातात आणि टीकूही शकतात.

अधून मधून कविता, कथाही पोर्टलवरती येत असतात. जेव्हा पोर्टलवरती छंद माझा वेगळामध्ये “सासू सुन किचन”, “चिनूची कलाकारी” आणि “कलाकार ऐशू” या तिघींच्या आगळ्या वेगळ्या कर्तृत्वाबाबत मी लिहिले, तेव्हा वाचकांकडून खूप कौतुक झाले. अजून आठवणीतली गोष्ट म्हणजे माझी नाट्य छटा “ती” ला आलेले अभिप्राय.

फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात वाचल्या जाणाऱ्या या पोर्टलची मी सदस्य असल्याचा मला अभिमान वाटतो.

२०२१ मध्येच दिवाळीच्या वेळी अगदी योगायोगाने सरांच्या “समाजभूषण” या पुस्तक प्रकाशन वेळी सातारमध्ये अलका ताई आणि सरांची भेट झाली. अलका ताईंनी तर पाहिल्याबरोबर ओळखले. जवळ बसवून घेतले. अगदी जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा झाल्या. एखादी मोठी संस्था चालवणारी व्यक्ती कशी असावी असे कुणी विचारले तर मी म्हणेन या पतीपत्नी सारखी असावी. कसलाच दिखावा नाही की अहंकार नाही. हेच गुण माणसाला यशस्वी बनवत असतात.
माझ्या सारख्या कित्येक जणांना असे व्यासपीठ मिळणे म्हणजे भाग्याची गोष्ट आहे.

आपले सण, दिन विशेष, व्यक्ती विशेष, प्रवास विशेष, याशिवाय कला, गाणी, पुस्तके, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असे अनेक सर्व समावेशक विषय आपल्याला या पोर्टलवर वाचण्यास मिळतात, माहिती मिळते. सर्व प्रकारच्या कलेची कदर इथे केली जाते.

अशा अनेक उत्कृष्ट विषयांच्या फुलांनी लगडलेला हा वृक्ष आज ८४ पेक्षात जास्त देशात पोहचून सुगंध पेरीत आहे. हे पोर्टल अलका ताई आणि देवेंद्र भुजबळ सरांची कन्या देवश्री हिचे स्वप्नबीज. आज ते बहरू लागले आहे. आकार घेऊ लागले आहे. ईश्वर कृपेने याचा असाच वटवृक्ष व्हावा हिच अपेक्षा.

मनिषा पाटील

— लेखन : सौ.मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
Mrs Vandana Suhas Inamdar on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…