आज काल गड्या कधीही येतो
पटकन गडपही होऊन जातो
कळत नाही कुठे लपून बसतो
शोधायचं कुठे तुला जरा सांगतो
पूर्वी तू अगदी वेळेवर यायचा
बळीराजा वाट तुझी पहायचा
पावशा तो ओरडून सांगायचा
मोर नाचून साथ ती द्यायचा
चातक होतसे तृप्त पाणी पिऊन
तप्त धराही जायची शांत होऊन
झाडे वेली यायच्या तरतरुन
घरे रस्ते व्हायचे स्वच्छ धुऊन
संगत कधी तू वादळ घेऊन येतो
रस्त्याचे तर तळे करुन सोडतो
शेतातील मातीही वाहून नेतो
धान्य कधी खळ्यात भिजवितो
कधी येतोस तू अगदी वेळेत
बळीराजा पेरणी आनंदे करतो
नंतर बसतोस ढगाआड लपून
दुबार पेरणीचे संकट आणतो
ऐकू म्हणतोस तुझी कहाणी
माणसे झालीत अति शहाणी
अडवत नाहीत वाहणारे पाणी
झाडे कुठे लावतात माळरानी

— रचना : डॉ. सौ.अनुपमा पाटील. ठाणे
२. सैराट पाऊस
उकाड्याने होतो आम्ही हैराण
बरसणार तु कधी आतुरतेने पाहतो आम्ही तुझी वाट !!
अचानक तु एकाच दिवशी येतो असा सैराट होऊन
आम्हा मुबंईकरांची लावतो पुरती वाट !!
एक दिवसांत होते मुंबईची तुंबई
लोकल होतात ठप्प
घरात शिरत पाणी च पाणी
तरी आम्ही मुंबईकर गातो तुझी गाणी !!
कारण दोष तुला आम्ही देणार नाही
आमच्या चुकांची शिक्षा हि आम्हाला मिळत आहे
तरी प्लास्टिक वापराचे आम्ही काही सोडणार नाही !!
भ्रष्टाचारच्या विळख्यातून मुंबई आमची काही बाहेर पडत नाही
किती हि तु बरसलास जोरात तरी
तुझ्या वरचे प्रेम काही होणार नाही कमी !!
एकच सांगणे आहे तुला पावसा
माझ्या दुष्काळग्रस्त शेतक-र्याच्या शेतात बरसरे मनसोक्त तु एकदा !!
नको आता होऊन दे
शेतकऱ्यांच्या आत्महत्या
त्यांच्या हि कुटुंबाला दे त्या सुखाच्या, आनंदच्या तुझ्या सरी वर सरी ll

— रचना : सौ.मंदा विजय शेटे. चेंबूर, मुंबई 😊🙏. — संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800