दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याच्या द्रुष्टीने वैयक्तिक गुंतवणूकदारांचा भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात गेल्या काही वर्षांत निरंतर रस वाढत आला आहे. गेल्या ५ वर्षात ३१ आँगष्ट २०१६ रोजी १,२५,३९४ कोटी रूपये गंगाजळी होती. त्या पातळीवरून ती चार पटीने वाढून ३१ मे २०२१ अखेर ४,६७,३६६.१३ कोटीवर गेली आहे.
या पार्श्वभूमीवर “धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड” या पुस्तकाचा परिचय करून घेणे निश्चितच उपयुक्त ठरेल……
लेखकाचा परिचय :-
“धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड” या पुस्तकाचे
श्री अरविंद परांजपे हे आर्थिक व औद्योगिक जगतातील अर्थ सल्लागार म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दै.सकाळ मध्ये “गुंतवणूक आणि भारतीय अर्थव्यवस्था” याविषयी त्यांनी केलेल्या लेखनाला वाचकाचा चांगला प्रतिसाद मिळाला. याखेरीज पुणे आकाशवाणी करिता ‘अर्थजिज्ञासा‘ या सदरात त्यांनी लेखन केले तर आहेच शिवाय, ‘येरे येरे पैसा‘ ही गुंतवणूक विषयक रंजक संवादाची मालिका सादर केली आहे.
या विषयावर त्यांनी पुणे, नाशिक, सातारा, तळेगाव आणि आँस्ट्रेलियात ब्रिस्बेन व पर्थ येथे व्याख्याने दिली आहेत. गेल्या २५ वर्षाच्या अनुभवातून हे पुस्तक तयार झाले असून सकाळ प्रकाशनानेच ते प्रसिद्ध केले आहे.
म्युच्युअल फंड हे साधन अगदी सामान्य गुंतवणूकदारासह सर्वांनाच आर्थिक सम्रुध्दीकडे घेऊन जाऊ शकते. परंतु हे नेमके साधावयाचे कसे ? याचे दिशा दिग्दर्शन श्री अरविंद परांजपे यांच्या
‘धनवृध्दीसाठी म्युच्युअल फंड‘ या २०० पानी पुस्तकात सोप्या आणि रंजक संवादात्मक शैलीत मांडण्यात आले आहे.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकी सारख्या विषयाची माहिती देण्याअगोदर आपली आर्थिक ध्येये समजून त्यानुसार योग्य असे गुंतवणूक प्रकार कसे निवडावेत याचे मार्गदर्शन श्री परांजपे यांनी या पुस्तकात केले आहे. बचतीतून जमलेल्या धनात भर घालण्यास म्युच्युअल फंडाचे साधन कसे वापरता येईल आणि या विषयातील बारकावे कशाप्रकारे जाणून घेता येईल याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
स्वतःला योग्य आणि स्वतःच्या विचाराने लाभदायी गुंतवणूक कशी करावी, याचे छान पैकी दिग्दर्शन कलाकार आणि सर्वांना या पुस्तकातून केले गेले आहे.
म्युच्युअल फंड हे साधन अगदी सामान्य गुंतवणूकदारासह सर्वांनाच आर्थिक सम्रुध्दीकडे घेऊन जाऊ शकते. परंतु हे नेमके साधावयाचे कसे याचे दिशा दिग्दर्शन श्री अरविंद परांजपे यांच्या ‘धनव्रुध्दीसाठी म्युच्युअल फंड’ या २०० पानी पुस्तकात सोप्या आणि रंजक संवादात्मक शैलीत मांडण्यात आले आहे.
गेल्या १७-१८ वर्षात देशात आणि परदेशामध्ये अनेक आर्थिक स्थित्यंतरे झाली. त्याबरोबरच अनेक पेचप्रसंग बघायला मिळाले. मात्र या काळात म्युच्युअल फंडातील चांगल्या इक्विटी योजनांनी नियमितपणे केलेल्या गुंतवणूकीवर वार्षिक सरासरी २०% टक्के पेक्षा जास्त परतावा दिला ही बाब महत्वाची आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही नव्या वळणावर असल्याचे विवेचन करून श्री परांजपे यांनी पुस्तकाचे मुख्य पाच भाग करून प्रत्येक भागात ७-८ उपविभाग केले आहेत. स्थुलमानाने त्यात गुंतवणूक करण्यापूर्वीची पावले, म्युच्युअल फंड व त्याचे प्रकार, गुंतवणूकीविषयी, फंडाची जडणघडण, पेन्शन प्लँन, गुंतवणूकदाराची मानसिकता, इक्विटी शेअर्स, इक्विटी फंड, संपत्ती निर्मितीची गुरू किल्ली, चक्रवाढ गतीची जादू, महागाईकडे लक्ष ठेवून मी कशात पैसा गुंतवू, गुंतवणूक विश्वातील महत्त्वाच् या संकल्पना, प्राप्तीकर सवलती, विश्वस्त निधीची गुंतवणूक, निवडक योजनांची कामगिरी इत्यादींची सोप्य भाषेत माहिती दिली आहे.
आर्थिक नियोजनाने कशी सुरुवात करावयाची, आपली आर्थिक उद्दिष्टे कशाप्रकारे ठरवायची याची विस्तृत कल्पना दिली आहे.
प्रत्येक प्रकरण संपल्यानंतर अशा ‘थोडक्यात महत्वाचे‘ म्हणून चौकटी दिल्या आहेत. उदाहरणार्थ :
या आर्थिक विषयावरच्या पुस्तकात नीता, जय, राजेश, त्याची पत्नी आणि स्वतः अवीकाका अशी पात्र रचना करून अतिशय सुरेखरीत्या संवादाच्या माध्यमातून सोप्या शब्दात माहितीपूर्ण विवेचन केल्याने या विषयाची उत्सुकता लेखकांनी फारच छानपणे वाढविली आहे.
घरातील सर्वच सदस्यांना हे अर्थशास्त्रावरील क्लिष्ट वाटणार नाही इतके सहज सुलभ आहे.
थोडक्यात, श्रीमंत होण्याचा मूलमंत्र हे पुस्तक देते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

– लेखन : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800