कावरले, बावरले, तुजविण मन माझे… विरहाने ।
बोल सखे, आज असा, काय गुन्हा मज झाला ।।
बंध नवे, प्रेमाचे, सारे तो तोडून गेला ।
छंद तुझ्या, मिलनाचा, तनमन जाळून गेला ||ध्रु.||
रूप तुझे, नयन तुझे, अन्य दिसे ना काही ।
भास तुझे, असण्याचे, होती कळे ना काही ।।
धावत ये, मजपाशी, खेळू नको या जीवाशी ।
झुरते आता, मन माझे, जवळी ये ना जराशी ।।
आठव ते, क्षण सारे, साठवले डोळ्यांनी…..||१||
घे ना जरा, मजलाही, समजूनि तू प्रेमाने ।
मिळूनी आता, संगतिने, प्रेमाचे गाऊ गाणे ।।
सोड आता, रुसवा तुझा, जुळवू एकपणानी ।
गोड असे, नाते हे, फुलवूया दोघांनी ।।
ध्यास पुन्हा, मिलनाचा, घेऊ एकमतानी…..||२||

– रचना : आमोद अ. पाटील