‘बाबा चला ना,
आपण कुठेतरी जाऊ या’, ‘बाबा नोकरी लागायच्या आधी, कुठेतरी जाऊन येऊ या’ मुलांची अशी भुणभुण ऐकून संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी आपल्या कुटुंबीयांसमवेत ‘जम्मू-कश्मीर पृथ्वीवरील नंदनवन’ पाहण्यासाठी निघाले. तिघेही एकमेकांचे नातेवाईक. डोंबिवलीतील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली येथे राहणारे.

जम्मू- कश्मीर मधील प्रेक्षणीय ठिकाणे आनंदात पाहता पाहता, “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून प्रसिद्ध असलेले पर्यटकांचे आवडते ठिकाण ‘पहेलगाम’ पाहण्यास निघाले. पहेलगाम म्हणजे निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेले आणि त्याच पहलगाम मधील ‘बैसरन’ हे गवताळ पठार, पाईन वृक्षांचे घनदाट जंगल आणि पर्वतांनी वेढलेले असे पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण.
येथेच निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असताना दहशतवाद्यांनी अत्यंत निर्घृणपणे प्रत्येकाला नाव आणि धर्म विचारुन वेचून वेचून गोळ्या घातल्या. त्यात डोंबिवलीचे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी हे मृत्युमुखी पडले. संजय लेले, वय वर्षे ५२, ठाणे येथील बायोजेनिक कंपनीत नोकरीला होते. डोंबिवलीतील ‘रजनीगंधा’ या दुकानाचे मालक, श्री वैद्य यांचे ते नातेवाईक. त्यांचे काका मुंबई महापालिकेत नोकरीला होते. नवापाडा, डोंबिवली पश्चिम येथे राहणारे! मुलगा नुकताच पदवीधर झाला आहे. तर मुलगी आणि पत्नी पाच सात फूट अंतरावर असताना अतुल मोने यांच्या जवळ एका दहशतवाद्याने त्यांना इस्लाम धर्माची प्रार्थना म्हणण्यास सांगितली व त्यांनी नकार देताच तात्काळ अमानुषपणे गोळी घालून मुलगी व पत्नी यांच्यादेखत त्याना ठार मारले. काय वाटले असेल त्यांना…? हेमंत जोशी यांचीही अशीच कथा !
असा कोणता गुन्हा होता या सर्वांचा..? केवळ हिंदू होते हा! की सुसंस्कृत होते हा ! तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे “आता भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी” अशीच वेळ आली आहे.
हिंदूंनी स्वसंरक्षणाचे शिक्षण घेतलेच पाहिजे. तसेच सर्व हिंदूंनी संघटित होण्याची आता वेळ आली आहे.
या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.
सर्व मृतांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सोसण्याचे बळ ईश्वर देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभो !
— लेखन : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800