१. हल्ला
कायम मनात जळफळाट,
भारत होतो कसा समृद्ध,
आजवर तुमचे भेकड चाळे,
आता झेला हे युद्ध,
फक्त पोकळ गप्पा तुमच्या,
दम कुणातही तो नाही,
केवळ काही अग्निबाण, अन्
तुमची पाळताभुई,
आता विसरा स्वप्ने सारी,
ही जमीन खाली करा,
कितीक वर्षे वेठीस धरली,
तुम्हीच आमुची धरा,
खंड खंड होईल तुमचा,
कळणारही तुम्हास नाही,
कोण तुम्ही ? ओळख विसरा,
या जगात थारा नाही,
पाप साठले, अगणित रांजण,
हिशोब होईल तो पुरा,
खुशाल आता, छाती बडवा,
झडला तुमचा तुरा…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
२. दहशतवादाला आळा
(द्विपदी काव्य रचना)
जात धर्म, कशाला हवे बंधन !
हृदयात माणुसकीचे स्पंदन
अवयव सुंदर देतो रे दाता
कर्म करावे समजून त्राता
आळा दहशतवादाला हवा
रोज कुरघोडी करणे धर्म नवा
सौभाग्य लेणे लुटले आज
कुठून चढतो रे ! तुम्हां माज !
आई बहिण नाते न टिकवले
कांड करणे एवढेच शिकवले !
सौभाग्य टिकवण्या आर्त आली कानी
पुसले ताईचे सौभाग्य दुष्ट द्रुमनांनी
मनाच्या ज्वाळा ह्या भडकल्या!
शाप देत पापभिरूत धडकल्या
हाय लागते रे! कोणा आईची ?
पापभिरू जाण गोष्ट नवलाईची
जन्म मिळतो एकदाच मानवचा
परि नरकासुर!वृत्तीत दानवाचा
एक दिवस असाही रे उजाडतो !
दीप लावण्या मनी तेथेच सडतो
निर्वंश होतो आयुष्यात जेव्हा
पाप वृत्ती सदैव आठवते तेव्हा
अल्ला का बंदा म्हणतात कशाला ?
पापाचा कडेलोट खंदक उशाला
किती माऊलींचा घेतला रे शाप ?
मरताना बसणार काळजाला धाप
कुठल्याही देशात जन्माला यावे
अरे!अज्ञानी मातीचे ऋण फेडावे
दहशत ! दहशत ! करतो तिरस्कार
पातक्या कोण?करणार नमस्कार !
लाथा बुक्यांनी होणार रे स्वागत f!
त्यापेक्षा माणूस म्हणून ये शरणागत
दहशतवादास घालू चला आळा
नको राक्षस!जन्मा येवो काळा!
रण चंडिका अवतार घे आई !
बकासूर नेस्तनाबूत कर गे माई !

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800