नमस्कार मंडळी.
मध्यंतरी कौटुंबिक विवाह सोहळा असल्यामुळे आपले पोर्टल तीन दिवस बंद ठेवावे लागले. या विवाह सोहळ्यासाठी, नवं विवाहित दांपत्यास आपणा पैकी अनेकांनी शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
श्री राजाराम जाधव साहेब मंत्रालयात बऱ्याच वेळा भेटत असत. बंजारा समाज साहित्य व संस्कृत संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन💐
— गिरीश देशमुख.
निवृत्त शासकीय छायाचित्रकार, मुंबई
२
बंजारा संमेलन : अध्यक्ष पदी राजाराम जाधव
we are proud of u dear Jadhao sir 🙏 Our portal has given u the right place. Congratulations. 🌹
— Ranjitsinh Chandel. yavatmal
३
प्रा. डाॅ. विजय पांढरीपांडे सरांच्या लेखणीचं तेज सदैव ज्ञानवर्धक कणांची उधळण करत असतं. वाचक त्या लिखाणात अगदी अंतर्मुख होऊन जातात. लेखनकार्या साठी त्यांनी निवडलेले विषय व सविस्तरपणे त्यांचं केलेलं विश्लेषण अत्यंत वाचनीय असतं.
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा
४
सर नमस्कार,
आपल्या आजच्या पोर्टलमध्ये नीलाताईंनी आपल्या लेखाद्वारे एका अशा अद्वितीय व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला आहे की तेथे कर माझे जुळती. येथे शब्दही थिटे पडले. अत्यंत सुसंस्कारी आणि उच्च शिक्षित घराण्यात जन्म घेतलेल्या पद्मश्री डाॅ. सँड्रा देसा सुझा यांनीही आपल्या आजोबा, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून घराण्यात चालत आलेला अव्याहत रुग्णसेवेचा वारसा तर जपलाच पण तो उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवला. खूपच छान माहितीपूर्ण लेख आहे. काॅकलियर इम्प्लांट बद्दल सखोल माहिती मिळाली.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
माझी जडणघडण ४५ वरील अभिप्राय
१
राधिका ताई खूप वाट पाहत होते मी जडणघडणच्या नवीन भागाची..
एका श्वासात अखेर वाचून टाकला .. जीवनाच्या दुसऱ्या आणि महत्वाच्या दुसऱ्या टप्प्यात तुमचे पदार्पण वाचून आम्हीही सोबत केदार बंगल्यात आल्यासारखा वाटलं.. खरं आहे, महत्त्वाचं सामान नसतं महत्त्वाच्या असतात त्या आठवणी.. तुमच्या नवीन घराचा सामान आवरताना, जुन्या घराच्या आठवणींना आवरणं किती अवघड गेलं असेल ते मी समजू शकते… नोकरी करण्याचा तुमचा ठाम स्वतंत्र निर्णय आवडला.. अस्तित्वाची गरज शब्द मनात खोलवर उतरला.. अस्तित्वासाठीच्या तुमच्या लढ्याला आमचा सलाम.
— मानसी म्हसकर. बडोदा
२
45 वा भाग आवडला. पुस्तक छान होणार अजून किती भाग राहिलेत ?
— नंदिनी चांदवले. पुणे
३
छान लिहिलेत सर्व
— प्रा.संजीवनी कुलकर्णी. पुणे
४
खूपच सुंदर वर्णन करता तुम्ही राधिकाताई. घडलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात.
— प्रज्ञा मिरासदार. पुणे
५
खूप सुंदर लिहित असता.. प्रत्येक भाग जपून ठेवावा असाच आहे.
— ऋचा पत्की. लातूर
६
पहिला पगार हा प्रत्येकाच्या आयुष्यात अति महत्वाचे आहे. पहिल्या मिळकतीतून वडिलांचे ही तिकीट काढणे हे आपलं अस्तित्व असतं .
प्रत्येकाने त्याचं स्वत्व जपलंच पाहिजे.
जडणघडण साठी तो महत्वाचा भाग असतो .
जडणघडण वाचावीच अशी आहे….
— अरुण पुराणिक. पुणे
७
राधिका छान लिहिलं आहेस. मला फार आवडले .. विशेष करून शेवटचा भाग !! आहे त्याच्याशी fully agree..
Financial indendence gives us confidence in every field of life.
— सुचेता खेर. पुणे
८
आजचाही लेख नेहमीप्रमाणेच उत्तम ! तुझ्या या लेखात तू नोकरी करण्याचा जो निर्णय घेतलास, त्यामुळे तुझी तुला ओळख जास्त झाली.
— आरती नचनानी. ठाणे
९
राधिका आजची तुझी जडणघडण वाचताना अधिकच आनंद मिळाला.
सुरेश भटांच्या केव्हातरी पहाटे या गझलेने सुरवात करून जीवनातील स्थित्यंतरे आणि स्थलांतरे तू दाखविलीस.
प्रत्येकच वाचक तुझी ही जडण घडण वाचताना त्यात स्वतःला पहाणार, मीही पाहिले.
तुझे करारी आणि बिनधास्त व्यक्तीमत्व या लेखात विशेष जाणवले. आर्थिक दृष्ट्या सक्षम असण्याची प्रत्येक स्त्रीला गरज आहे हे या लेखातून चांगलेच पटले. केवळ पैशासाठी नव्हे तर स्वत्वा साठी असे सक्षम असणे आवश्यक आहे हे मनापासून पटले.
अशीच लिहित रहा ! आम्हा वाचकांच्या सदिच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेतच !
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे
१०
खूप छान लेख.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे
११
राधिकाताई, प्रत्येक स्रीच्या मनातले लिहीले आहे.
आर्थिक गरज म्हणूनच करिअर केली पाहिजे असे नाही. परंतु बाहेरच्या जगात पडल्यावर खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात. वेळेचे महत्व पटते. माझे लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याचा विरोध असतानाही माझ्या सासूबाई खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या.
“घरचं सर्व मी सांभाळीन. तू तुझ्या शिक्षणाचा उपयोग कर.”
खूप सुंदर लेख आहे.
स्रीच्या करिअरला घरचा सपोर्ट तर हवाच. पण तिची स्वतःचीही जिद्द हवी.
— सौ.अंजोर चाफेकर. मुंबई
१२
किती छान लिहिला आहेस बँकेतील पहिल्या दिवसाचा अनुभव !आम्हाला पण आता कळेल तुझ्या नोकरी करण्याच्या दिवसांतले किस्से !
— आरती नचनानी. ठाणे
१३
आता बॅंकेतील तुझ्या पुढच्या प्रवासाची उत्कंठा लागून राहिली आहे.
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे
१४
रॉड्रिक्स आणि फर्नांडिस च्या चेह-यावरील फिक्स्ड भाव (आणि तुझ्या चेह-यावरचे बदलते भाव सुद्धा) डोळ्यांसमोर दिसावे, इतकं हुबेहुब वर्णन इतक्या वर्षांनीही शब्दात उतरवले आहेस. खूप छान.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे
१५
ओह ! …. खरंच ऑफिसचा पहिला दिवस असा रुक्ष गेल्यावर त्याचा परिणाम त्यावेळेस आपल्या मनावर होतोच.
— अस्मिता पंडीत. पालघर
१६
तुम्ही लिहिलेल्या आठवणी वाचल्या की मला तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. माझ्याही शिक्षणाच्या काळात बरेच वेळेला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले, कारण घराचा आधार नव्हता. काॅलेजचे पहिले वर्ष रत्नागिरी ला झाले. त्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी सांगली ला हॉस्टेलवर राहत होते. तिथे येण्यापूर्वी माझं आयुष्य रत्नागिरी सारख्या लहान गावात गेले होते. बाहेरच्या जगाचा अनुभव नव्हता. घरात धाकटी म्हणून लाडकी ! कशाची सवय नव्हती आणि हॉस्टेल ला आल्यावर एकदम एकटेपणा जाणवला.. जग कसं आहे ते कळायला लागले. हातात पैसा खूप कमी, त्यामुळे हॉस्टेल चे दिवस मजा करायसाठी असं मला नव्हतं तर गरज म्हणून कमीत कमी पैशात भागवाव लागत असे. मला नॅशनल स्कॉलरशिप होती. महिन्याला 85 रुपये पण ते पैसे वर्षभरात एकदाच मिळत असत. आई वडील बदली च्या गावी मराठवाड्यात होते.
जुन्या आठवणीं खरं तर कटूच होत्या.. पण आता मात्र मी त्या
एन्जॉय करतेय !
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
१८
जडण – घडण — भाग 45, 46 दोन्ही वाचले. जिद्दीने मिळवलेली नोकरी, मग पहिल्या दिवशी आलेला अनुभव. वेगवेगळ्या ठिकाणच्या घरांच्या आठवणी. सगळं छान लिहिलं आहेस. सतत तूच डोळ्यसमोर येत होतीस.
तुझ्या लेखानाचं हे सौंदर्य आहे की ते वाचतांना सगळं डोळ्यासमोर उभं राहतं.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई
सर,
मालगुंड येथील केशवसुत स्मारक, को म सा प उभे करण्यासाठी मधुभाई यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा 🙏💐
— गणेश जोशी.
व्यंगचित्रकार, ठाणे
राजा हरिश्चंद्र वाचून बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या.. खरेच काही लोक कसे जीव तोडून काम करीत असत… त्यांच्या मुळे पुढची पिढी किती सुखी झाली. त्यांनी खस्ता खाल्ल्या पण इतरांसाठी आनंद वाटला.
— स्वाती वर्तक. मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800