अलिकडे तू, पाठवलास
चित्रातला कृत्रिम पाऊस
मुसळधार शुभेच्छा इ,
आणि मी विचारले मनाला
खरंच का आपण, भिजलो होतो
कधी ओल्याचिंब पावसात ?
असले भाबडे प्रश्न तुला
कधी पडतात कां ?
की सारं काही जाणवूनसुध्दा
कोरडेपणाचा बनाव करु लागलीस,
हल्ली काही कळेनासं झालय
निसर्ग आणि माणूस
बेशिस्त वागू लागलाय
एवढे मात्र खरं………!
– रचना : सुरेखा पाटील
– संपादन : सौ अलका भुजबळ