साहित्यकणा फाउंडेशन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन नाशिक येथील मेरी, म्हसरूळ येथे नुकतेच करण्यात आले होते. सभासदांच्या उपस्थितीत संस्थेचा अहवाल सादर करण्यात आला व नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. सभासदांनी संस्थेच्या पारदर्शक कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
साहित्यकणा संस्थेचा कारभार इतर संस्थांसाठी आदर्शवत ठरणारा आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी आपल्या भाषणातून मांडले.
यावेळी साहित्यकणा कार्यकारणीची निवड पुढील ५ वर्षांसाठी करण्यात आली…
अध्यक्ष -संजय द. गोराडे, उपाध्यक्ष -सुरेखा बोऱ्हाडे, सचिव -विलास पंचभाई, सहसचिव- दिगंबर काकड, खजिनदार -सुरेश चौरे, सदस्य -उमांकात दहाड व सुजाता येवले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच तालुकास्तरीय कार्यकारणीचीही निवड यावेळी करण्यात आली. सिन्नर विभागासाठी अध्यक्ष सुनिता वाळूंज व सचिव मोहन वाकचौरे व नांदगाव विभागासाठी काशिनाथ गवळी व सचिव प्रतिभा पवार-खैरनार हे काम पाहतील.

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. साहित्यकणा सभेचे प्रास्ताविक विलास पंचभाई यांनी केले व अहवाल वाचन संजय गोराडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सागर जाधव, वैशाली शिंदे, रजनी चिंतावार, सविता पोतदार, अलका अमृतकर, आशा गोवर्धने, उत्तम खताळे, जनार्दन भोये, नीलम परदेशी, राजेंद्र चिंतावार, अशोक बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुजाता येवले यांनी केले व आभार सुरेखा बोऱ्हाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी केतकी पंचभाई यांनी परिश्रम घेतले. साहित्यकणा संस्था ही साहित्यिक क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही यापुढील काळात काम करेल – अध्यक्ष संजय गोराडे
साहित्यकणा संस्थेचा सचिव या नात्याने संस्थेचा विस्तार राज्यभर करण्याचा मनोदय आहे – सचिव विलास पंचभाई.

संस्था परिचय :
साहित्य कणा फाउंडेशन चे हे दहावे वर्ष आहे. दरवर्षी काव्य स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धेला महाराष्ट्रातून शंभरच्यावर कवी उपस्थित असतात व या समारंभासाठी नाशिक व परिसरातून जवळजवळ दोन अडीचशे रसिक उपस्थित असतात..
आतापर्यंत कवी संमेलनासाठी किशोर पाठक, लक्ष्मण महाडिक, राम कुलकर्णी, फुला बागुल, श्रीपाल सबनीस, ऐश्वर्य पाटेकर, संजय चौधरी, राजन लाखे, महंत सुधीर दास, घनश्याम पाटील, अविराज तायडे इत्यादी महान असामींची अध्यक्ष, उद्घाटक म्हणून उपस्थिती लाभलेली आहे..
या कार्यक्रमादरम्यान कथा कविता कादंबरी व बाल साहित्य यांना विशेष पुरस्कार दिले जातात. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, एक हजार रुपये रोख तसेच कवी स्पर्धेमध्ये पाच बक्षीस असतात प्रथम पंधराशे, द्वितीय साडेबाराशे, तृतीय एक हजार रुपये, चतुर्थ साडेसातशे रुपये, पंचम पाचशे रुपये या प्रमाणे दिले जातात. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विकलांग यांनाही विशेष पुरस्कार दिला जातो. अशा प्रकारे साहित्यकणाचे काम चालते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन💐💐