भारतातील निसर्गरम्य सर्वाधिक साक्षर, एक प्रगत राज्य म्हणून केरळ राज्य ओळखल्या जाते. अशा या केरळ राज्याची अभ्यासपूर्ण सफर आपल्याला घडवणार आहेत खुद्द केरळच्या रहिवासी असलेल्या सौ मनिषा पाटील.

कवियत्री असलेल्या सौ.मनिषा दिपक पाटील या केरळ मधील पालकाड येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण बीएस्सी पर्यंत झाले असून त्यांना वाचन, लेखन, पाक कला, पर्यटन या गोष्टींची आवड आहे.
सरकार मान्य अष्टपैलू संस्कृती कला अकादमी आयोजित राज्यस्तरीय मासिक स्पर्धेमध्ये कविता लेखनाबद्दल त्यांना उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट असे पुरस्कार मिळाले आहेत.
विविध काव्य स्पर्धेतूनही त्यांना उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट, भावस्पर्शी मानांकन मिळाले आहे.
चारोळी समूहासाठी फुलांवर रोज एक चारोळी लिहिते.
आतापर्यंत १२० फुलांवर त्यांच्या चारोळी लिहून झाल्या आहेत.
त्या आपल्याला घडविणार असलेली केरळची सफर आपल्याला नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे.
तर मंडळी उद्याच्या पहिल्या भागात आपण पाहू या “केरळचा इतिहास “..
सुरेख केरळचे निसर्ग सौंदर्य
वर्णन अप्रतिम आहे
आम्ही जाऊन आलो आहे, आपले लेख वाचून परत जावेसे वाटते