काल, ३ मार्च रोजी, जागतिक वन्य जीव दिन साजरा झाला. त्या निमित्ताने कविता बिरारी यांची ही कविता नक्कीच उद्बोधक ठरेल.
– संपादक
वन्य जीव संरक्षण
आता गरजेचे
मानवसृष्टी वाचवणे
कार्य गरजेचे
व्याघ्र प्रकल्पात सहभाग
शासन पातळीवर सुरू
वाघिणीचे दूध घेता
होतेच ना गुरगुर
माळढोक पक्षी
संख्या नगण्यच
प्रजाती नष्ट झाली
शब्दंम वाक्यमं प्रमाणं
छावा, सिंहाचा वाटा
वन्य प्राणी राजा
सांगत होता पूर्वी
तुमचा आमचा आजा
पर्यावरणाचे दायित्व
वन्य जीव संरक्षण
कर्तव्य पूर्ती करून
मानवाचे अस्तित्व लक्षण

– रचना : कविता बिरारी. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800