Friday, October 18, 2024

४ अलक

दगड हाती घेत दगडावर त्याचे वज्र प्रहार पडू लागले, नक्षीदार कोरल्याने शिल्प तयार झालेले.
तो समाधानी नव्हताच, संभ्रमात होता नावाच्या.
इतक्यात लोकांनीच त्या शिल्पात भाव ओतले.
अस्तित्व मान्य करून…..!!

परिमळ सर्वांगाला लागल्याने तो खूष, चंदनाचे गुणगान गात होता.
खोड झिजलेलं चंदनाला कळलंच नाही.

तुफानी वादळात फांदीने झाडाचा आधार सोडलेला.
झाड कोसळल नाही, कणखरपणे उभ राहिलं.

अक्षराशी सूर जुळवताना, शाईने लेखणीला हाताशी धरलं.
कागद रंगीबेरंगी झाला. शब्दांचे वजन वाढलेले.

माधवी ढवळे

— लेखन : सौ माधवी ढवळे. राजापूर, जि: रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन