Saturday, June 14, 2025
Homeसाहित्य४ लघु कथा

४ लघु कथा


किती तरी वर्षांनी तिची मैत्रीण माहेरी येणार होती. योगायोगाने ती सुद्धा माहेरी आली होती .आणि तिला कळलं की ती दुसऱ्यांदा आई होणार आहे ! पण तिचं पहिलं बाळ सहा महिन्याचे असताना गेलं. ती ठरवते जुन्या आठवणी नाही काढायच्या ! कटू !! तिचा आवडीचा पदार्थ वरण फळ, कांदा शेंगदाणे, पापड तिला ! हा बेत तिला फार प्रिय ! कंटाळा आला करा वरणफळ ! खमंग खावस वाटतय करा वरणफळ !! रोजच्या स्वयंपाकात बदल करा वरणफळ हे तिला माहीत होतं ती येताच थोडा वेळ गप्पा होऊन ती वरणफळांची डिश, लोणचे, पापड, शेंगदाण्यासह सादर करते. ते पाहताच ती टेबलवरून उठून बाहेर हॉल मध्ये येऊन ढसाढसा रडू लागते. ती गोंधळून जाऊन तिला तिला कुरवाळीत कारण विचारते . ती थोडीशी शांत होण्याचा प्रयत्न करीत रडत रडत सांगते. हाच बेत करून मी नळाचे पाणी पहायला बाहेर गेले स्वैपाकाच्या बैठ्या ओट्यावर हे सर्व ठेवले होते. बाळ रांगत रांगत येऊन त्यानं पातेल्यावर असा जोरात हात दिला की उकळल्या फळांचं पातेल त्याच्या कोवळ्या अंगावर पडलं ते भयंकर भाजून गेल !!


आळंदी – पंढरपूर पायी वारी साठी ते नेहमी जात पंचवीस वर्षे त्यांची वारी चालू आहे. भजनात तर त्यांचा हातखंडा असे. त्याचं पाहून दोन नातवंडे ही भजनात हुशार झाली. दोन्ही नातवंडे एक चौथीत, तर एक दुसरीत होते.वर्गात त्यांना वारी बद्दल निबंध लिहायला सांगितला होता. या दोघांनी निबंध लिहायला पण वर्गात सर्वांना सरप्राइज द्यायचे ठरवले. तपासण्यासाठी शिक्षकांनी वह्या घेतल्या. मग त्या दोघांनी ईशारा करताच दहा बारा मुले टाळ छोटा मृदुंग, पताका, तुळशी वृंदावन घेऊन तालात नाचत पावले खेळत आली आणि ताल सुरात म्हणू लागली. ही पंढरीची वारी रामकृष्ण हरी. आली विद्या मंदिरी, राम कृष्ण हरी


तो सारखा आपल्या मोबाईल फोन कडे पाहत असतो. आज त्याच्या मुलाचा दहावीचा निकाल कळणार असतो.
“ए हॅलो, तेरा नंबर दे” असे म्हणत व्यापाऱ्याने खिशाला खोचलेला पेन काढून त्याने नंबर व्यापाऱ्याच्या डायरीत लिहून दिला .आपल्या मिठाच्या गाड्यांकडे पाहत घाम पुसला. चार पाच मिठाच्या गाड्या होत्या. प्रत्येक गाडीत चार ते पाच टन मीठ असे. आरोग्यदायी मीठ, काळे मीठ, सैंधव मीठ जाणकार त्याच्याकडून घेत असे. मालाची विक्री झाली की दुसऱ्या गाड्या तो राजस्थानातून मागवतो.
गावाकडे थोड्या शेतात आईवडील गुजरान करतात. तो बायको पोरं आणि सहकारी मिठाच्या व्यापारासाठी भ्रमंती करतो. त्याला आपल्या जगण्याचा उबग आला होता.भर उन्हात गावोगावी सारा संसार घेऊन फिरायचे, रस्त्याच्या कडेला बायकोने तीन दगडांची चूल मांडून स्वयंपाक करायचा. मिळेल तेवढ्या पाण्यात धुणे भांडी अंघोळ !! घरापासून ६-७ महिने फिरायचे. त्याने ठरवले की आता पोरग दहावी पास झालं की आपल्या गावातून मिठाच्या ऑर्डरी पाठवायच्या ! बस ही भटकंती !! एवढ्यात पोराचा फोन येतो पिताजी मै दसवी कक्षा में ६५% से पास हुआ.
त्याने आकाशकडे पाहून देवाला दुवा मागितला.


रोजच्या प्रमाणे तिने झाडू पोछा केला. कपडा बर्तन होताच ती हॉल मधील सर्व फर्निचर साफ करून गॅलरीत येते गॅलरीत ती बोनसायची रोपे पाहून तिला एक गद गद हुंदका येतो. तिला वाटतं की या बोनसायच्या रोपट्यागत आपलं आयुष्य झालंय ! जशी याला मुळातून बंदी आहे वाढायला तशी परिस्थिती आपल्या शिक्षण घेऊ दिलं नाही. प्रत्येक वर्षी पहिला नंबर असणारी मी सातवी होताच वडिलांच छत्र जाताच शिक्षण सोडून या पोटापाण्याच्या उद्योगाला लागले, आईला मदत म्हणून.

— लेखन : अलका मोहोळकर. पंढरपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments