Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
२ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या “आमची माती’ फेम : शिवाजी फुलसुंदर” या यशकथेस अपेक्षेप्रमाणे भरघोस प्रतिसाद मिळाला आणि अजूनही मिळत आहे. सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
या यशकथे विषयी व्हॉट्सॲप वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक

१. भुजबळ साहेब, आपण शिवाजीराव फुलसुंदर साहेबांची कामाची ओळख आपल्या पोर्टलद्वारे जगभरात पोहचवली त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक धन्यवाद
शिवाजीराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा 🏵️
– विजय पवार
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी. ह. मु. अमेरिका.

२. आरसीएफ कंपनीचे माझे मित्र, मानसिंग पवार यांच्यामुळे, शिवाजी फुलसुंदर यांची मैत्री झाली. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. कामाला वाघ होते. त्यांची आठवण मनाला सुखद धक्का देणारी आहे.धन्यवाद.
– विलास प्रधान. कामगार नेते, आर सी एफ, मुंबई.

३. शिवाजी फुलसुंदर यांचा जीवनप्रवास वाचून शेतकऱ्यांना काय पाहिजे हे समजणारी त्यांच्यासारखी माणसे फार थोडी असतात असे वाटले.. खरोखरच त्यांनी आपले जीवन शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी वाहून घेतले… 🙏
– लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.

४. प्रिय भुजबळ साहेब, आपण माझे स्नेही शिवाजी फुलसुंदर यांच्यावर लेख लिहून जुन्या आठवणीं जगविल्या. धन्यवाद.
– निरंजन राऊत. निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक
माहिती विभाग, मंत्रालय.

५. आपल्या सर्व न्यूज स्टोरीज खूप चांगल्याच असतात. आजची श्री शिवाजी फुलसुंदर यांच्यावरील स्टोरीही विशेष उल्लेखनीय आहे.
– दीपक शेडगे. मुंबई.

६. आमची माती आमची माणसं … शिवाजी फुलसुंदर यांची अतिशय सुंदर माहिती वाचायला मिळाली.👌👌सर्वच सदर सुरेख👍
– प्रणाली म्हात्रे. मुंबई.

७. 🙏🏼🙏🏼जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणसं 🙏🏼🙏🏼
– भाई चिंदरकर. मुंबई.

८. Hi, Read your article on Shri Shivaji Fulsundar. Nicely depicted article
Let Fulsundar live long life.
– Prabhakar Jejurkar.

९. शिवाजी फुलसुंदर हे नाव फक्त ऐकिवात होतं. असं म्हणाना, ‘आमची माती आमची माणसं’ हा दूरदर्शन वरील कार्यक्रम पहातांना वाचलं होतं. प्रत्यक्षात कधी भेटण्याचा योग आला नाही.

पण श्री भुजबळ साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवनपट, कार्यशैली ओघवत्या भाषेत वाचकांसमोर सादर केली. ती वाचत असताना आपणच हरवलो असल्याचे जाणवले.
श्री शिवाजी फुलसुंदर सरांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन.
उत्कृष्ट लेखन शैली व तेवढ्याच ताकदीने सादरीकरण यासाठी भुजबळ साहेबांचे व एनएसटी चमूचे विशेष अभिनंदन 🙏
– साहेबराव पुंड. निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

१०. शिवाजी फुलसुंदर यांच्यावरील लेख खूप छान लिहिला आहे. 👌🏾🇦🇹🇦🇹👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
– लक्षराज सानप. मुंबई.

११. मुंबई दूरदर्शनवरील कर्तृत्ववान अधिकारी, कार्यक्रम संकल्पक, दिग्दर्शक, निर्मात्यांपैकी शिवाजी फुलसुंदर यांचा नंबर फार वरचा आहे. मुंबई दूरदर्शनवरील कृषी आणि ग्रामविकास कार्यक्रम
“आमची माती आमची माणसं”, “कृषीदर्शन”. या कार्यक्रमाला दर्जेदार बनवण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. “गप्पागोष्टी” या मालिकेतून कृषी आणि ग्रामविकास कार्यक्रमाला सर्व प्रकारच्या ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची यशस्वी कामगिरी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतांना माझ्या कार्यक्रम करण्याच्या विविध संकल्पना राबण्याचं स्वातंत्र्य त्यांनी मला दिल्याने २ ऑक्टोबर २००० सालापासून सुरु झालेल्या “ग्रामीण जनतेच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव नेते, मंत्री आर आर पाटील ऊर्फ आबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानावर कार्यक्रम निर्माता म्हणून मला संधी मिळाली ती शिवाजी फुलसुंदर यांच्यामुळेच. २००० ते २००५ पर्यंत या कार्यक्रमाची निर्मिती करण्यासाठी मी आणि माझे सहकारी कॅमेरामन, साउंड रेकॉर्डीस्ट, इंजिनिअर्स, तंत्रज्ञ, सहाय्यक,चालक असा लवाजमा घेउन कोकण, प. महाराष्ट्र, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या आलेल्या गावात फिरायला मिळाले आणि या प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी ग्रामस्वच्छते बरोबर ग्रामविकासाच्या अफलातून संकल्पना राबवलेल्या बघावयास मिळाल्या. गावात, जिल्ह्यात, राज्यात, देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेल्या न भुतो न भवष्यती अशा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अल्पावधीत विकसित झालेलं चित्र बघण्याच भाग्य मला फुलसुंदर यांच्यामुळेच मिळालं. एव्हढंच नव्हे तर या कार्यक्रमाच्या उत्तम, दर्जेदार मोंटाजच्या निर्मितीच, केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामविकास योजनांवर असलेल्या विकासगंगा आणि विकासगाथा या कार्यक्रमाच्या निर्मितीची संधी आणि कार्यक्रम निर्मितीच्या विविधांगी संकल्पना राबण्याच स्वातंत्र्यही शिवाजी फुलसुंदर आणि जेष्ठ निर्माते आणि सहाय्यक केंद्र संचालक शशिकांत भोसले यांच्यामुळेच मिळालं. मलाही त्यामुळे उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करता आले. कृषीदर्शन कार्यक्रम निर्मात्यांसाठी देशभरातील ICAR च्या संशोधन केंद्रातील सर्व प्रकारच कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण मला मिळालं.

शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित कार्यक्रम करायला मिळाले. मुंबई दूरदर्शनवरील १९७७ ते १९८४ हा निर्मिती सहाय्यक टेम्पररी कार्यकाळ आणि १९८४-२०१४ हा माझ्या आयुष्यातील दूरदर्शनवर कार्यक्रम निर्माता म्हणून लाईफटाईम अचिव्हमेंट असलेला सर्वात महत्वपूर्ण काळ लाभला. या काळात माझे गुरू मनोहर पिंगळे, मुकुंद नाईक, भांबरे, अशोक डुंबरे, कारखानीस, एडीटर जोशी, ब्रीद, साने, केंद्र संचालक मुकेश शर्मा, लक्ष्मेंद्र चोप्रा, जेष्ठ निर्माते शशिकांत भोसले, नीना राऊत, शिवाजी फुलसुंदर यांच्यासारखे उत्तमोत्तम गुरु मार्गदर्शक म्हणून लाभले हे मी माझं परम भाग्य समजतो. परमेश्वर कृपेने मलाही दूरदर्शनच्या प्रेक्षकांचं उतराई होता आलं यांचा सार्थ अभिमानही वाटतो. शिवाजी फुलसुंदर यांना शुभेच्छा आणि शुभचिंतन.

देवेंद्र भुजबळ यांनी निवृत्ती नंतर योग्य वेळी योग्य विषयावर, योग्य व्यक्तींवर समयोचित असा उपक्रम वेबसाईट काढून आम्हांलाही पुन्हा लिहिते, लेखक केलेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद, शुभेच्छा आणि शुभचिंतन.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता. मुंबई दूरदर्शन

देवेंद्र भुजबळ साहेबांनी अगदी योग्य शब्दात आपला जीवन पट मांडला आहे 🙏👍
– सुखदेव फुलारी. अहमदनगर.

🌷👌🌷 परिपूर्ण आणि वास्तववादी लेख आहे सर! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अशोक निर्बाण
कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली.

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दृष्टिहीन गिर्यारोहक नेहा पावसकर यांनीही ध्वनिफिती द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री विलास कुडके यांच्या खुमासदार शैलीतील लेखनाला छानच प्रतिसाद मिळत आहे.त्यांच्या
‘काम टाळण्याची कला’ यावरील अभिप्राय असे आहेत….

१. प्रामाणिकपणे काम करणे चाटूकारितेच्या आजच्या काळात दुर्गण बनले आहे. मात्र जो सतत कार्यरत राहतो त्याचे आत्मबळ वाढत असते. आळसी बनून जगण्यापेक्षा कार्यतत्पर असणे कधीही चांगलेच असते. म्हणून बुद्ध म्हणतात –
यो च वस्ससतं जीवे कुसिती हीनविरियो ।
एकाहं जीवितं सेय्यो विरियमारभतीदल्ह्ळं ।।
अर्थ – आळसी बनून शंभर वर्षे जगण्यापेक्षा एक दिवसाचे कृतिशील जीवन श्रेष्ठ ठरते.
– श्री भिक्कू महेंद्र कौसल, निवृत्त संचालक (माहिती)

२. अतिशय सुन्दर लिहीले आहे सर. मी जिथे काम करते तिथे काम करणाऱ्या पेक्ष्या काम टाळणारे जास्त आहेत. अगदी पेन हातात घेवुन दिवसभर झोपा काढणारे सुद्धा पाहिले. परंतु जिथे आपण काम करतो आणि एका दिवसाला जेव्हढा पगार घेतो किमान तेव्हढे तरी काम आपण केले पाहिजे. शेवटी काम केल्यानंतर जे समाधान मिळते ते काम टाळण्यात नाही……
– सौ प्रिया रामटेककर

३. सर खूप सुंदर लेख लिहिला आपण…🙏🏻
काम करणारी आणि न करणारी माणसे कशी असतात आणि कसे कामे टाळतात याचे खूप सुंदर विस्तृत विवेचन केले…
खूप आवडले..👌🏻👍🏻
– श्री गोपाल जोध

४. वा ! तुमचे निरीक्षण किती सूक्ष्म आणि खरं आहे, हेच यावरून दिसून येतंय !
“जे न देखे रवी, ते देखे कवी”!
– श्री म. ना. राणे

५. वास्तवातील वास्तव चित्रण रेखाटलय विलासराव तुम्ही, बहुतेकांच्या कामाच्या तर्हा अगदी न समजण्या इतपत असतात असे काम न करणार् याला वाटते, पण तसे नाही समजणारा ते समजूनच जातो. लेख वाचत असतांना “कोणत्याही कार्यालयात कार्यालयीन क्षमतेच्या फक्त २०% लोकच काम करीत असतात,” या वाक्याची एका वरिष्ठ अधिकारी यांची प्रकर्षाने आठवण झाली.

सुंदर लेखन तर आहेच पण त्यातील ओघळती भाषा शैली मुळे लेख पूर्ण वाचल्या शिवाय वाचक थांबणारच नाही, असा विश्वास आहे

(आम्ही प्रकृती अस्वास्थ्यामुळे लेखन प्रक्रियेपासून लांब गेलो, पण तुम्ही न थांबता अखंडित पणे लिहीत राहा हीच सदिच्छा)

पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा💐💐
– श्री सा. ना. पुंड

६. आपला हाही लेख मार्मिक, खुसखुशीत आणि विनोदी शैलीने कटु सत्य कथन करणारा आहे. आपले गव्हर्नर राहीलेले सी.व्ही.रंगराजन यांनी एकदा व्याख्यानातून सांगितले होते की, “समजा १०० कर्मचारी एका कार्यालयात सेवेत असतील तर प्रत्यक्षात केवळ ३० च कर्मचारी हे खरं काम करीत असतात”. बाकीच्यांना आपण लेखात मांडल्याप्रमाणे काम टाळण्याची कला अवगत असते. तेव्हा आपलं कार्यालय हे केवळ ३०% वरच चालत असतं परंतु दाखवायचं असतं.
१००% कर्मचारीच आपलं कार्यालय चालवतात. म्हटलं तर वेदनादायक आणि म्हटलं तर सकारात्मक…..असं हे आहे.
आपण फार चपखल पणे निरीक्षण मांडले आहे. आपल्या लेखणीला असाच बहर वाढत जावो या सदिच्छा 👍🌹😊
– प्रा. गजानन शेफाळ

७. तुमचं लेखन छान असतं, अभिनंदन. पण तुम्ही थोडं अभिजात ललित-गद्याकडे वळायला पाहिजे असं मला वाटतं. असे विषय आपल्या अवतीभवती खूप आहेत. तुम्ही नक्की लिहू शकाल, शुभेच्छा !
– श्री प्रल्हाद जाधव, निवृत्त संचालक (माहिती)

९. Dear Vilasji in this small article u have nicely painted two types of people, shirkers n workaholic. Shrkers live a easye n comfortable life while woraholics have to work restlessly leaving comforts. Even though u as author gave a concealed message that the respect n love woraholics command, shirkers never have. U also rightly concluded that the do nothing n do everything is the inborn quality say it’s in blood. Congrats well done . Please extend my thankfulness to our respected Bhujbal sir,u took efforts to edit it beautifully. 👍💐
– श्री रणजितसिंग चंदेल

१०. लेख वाचला. प्रतिक्रिया देण्याचं काम टाळता आलं असतं पण आपण मेसेज टाकून कामाची आठवण करून दिली व आपण दिलेल्या लेखातील बरं वाईट काही तरी द्या असे आदेश दिला मग साहेबांचा आदेश पाहून सांगतो व सांगून पाहतो यापलीकडे जाऊन पुन्हा लेख वाजता हलकं फुलकं लिहिलेलं आपण, हे मन आला भावल इतकच 😂😂😂
– श्री नीतिन बागुल

१०. 👌🏼👌🏼😅😁खुप कामातून वेळ काढून वाचला लेख. खुप दिवसांनी एक चांगला विनोदी शैलीतील लेख वाचायला मिळाला. धन्यवाद. well done
– श्री शिशिर कुलकर्णी.

११. मस्त
– श्री हेमंत खैरे
१२. Nice
– श्री संजय पाईकराव
१३. वाह क्या बात है
– श्री आबेद शेख
१४. Keep it up..👍👍
– वृषाली बर्गे
१५. सर, अप्रतिम लेख आहे.🙏🏻
– श्री प्रकाश देशपांडे
१६. Nice article 💐💐
– श्री दिगंबर पालवे

सर्वश्री चंद्रकांत धम्मा, अनिल साळुंखे, मंगेश वरकड, किरण शेलार यांना देखील लेख आवडला असे कळविले आहे.

३१ मे रोजी आपण तंबाखू विरोधी दिंन विशेषांक प्रकाशित केला. त्यातील श्री राजेंद्र वाणी यांच्या व्यसनमुक्ती कवितेवर भरपूर प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्या पुढे देत आहे.

मान. संपादक
न्यूज स्टोरी टुडे,
कवी राजेंद्र वाणी सरांनी व्यसनमुक्ती ही कविता खुप छान लिहिलेली आहे. खरंच ! आज आपले संपूर्ण विश्व व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. आपण आणि डे साजरे करतो, पण-पण व्यसनमुक्ती डे कधी साजरा केला आहे का हो ? नाही ना–!!!
दारू, सिगारेट, तंबाखू ही सारी व्यसने जीवघेणी आहेत. पण आजची तरुण पिढी या व्यसनांना फॅशन समजते. आणि आपल्या संपूर्ण शरीराचे नुकसान करून घेते. आपणा सर्वांना माहीत आहे, व्यसन हे नरकाचे द्वार आहे. तरीसुद्धा आजची तरुण पिढी हे द्वार ठोठावत असताना दिसून येते.

आपल्या सोन्यासारख्या देहाची नासाडी करून घेते. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेली आपण पाहतो. ज्या घरात दारू पिणारी माणसे असतात त्या घराचे नंदनवन कसे फुलेल. त्या घरात लक्ष्मी कशी वास करेल? त्या घरातल्या लेकरांना, पत्नीला, आईला वडिलांना स्वास्थ्य लाभेल काय ? यासारख्या अनेक प्रश्नांची सरबत्ती पुढे उभी राहते. ही दारू संसार उध्वस्त करते. घरातील लक्ष्मी केव्हाच बाहेर निघून गेलेली असते. पोराबाळांच्या शिक्षणाची तर खूप फरफट होते. सगळेजण या कुटुंबावरती फिदीफिदी हसत असते.

कामावर न जाता हा माणूस दारू पिऊन कुठे तरी पडलेला असतो. दिवसभर मिळवलेला पैसा या दारूत ओतून टाकतो. बायको नवरा कधी घरी येईल याची बिचारी वाट पाहत बसलेली असते. देवाकडे सतत प्रार्थना करत असते, परमेश्वरा माझा धनी व्यवस्थित घरी येऊ दे. पण याची याला काही फिकीर पडलेली नसते. संसाराची अशी राखरांगोळी होते. दारूचा प्याला हा त्याचे आयुष्य बरबाद करून टाकतो. त्याच्या जीवनातील सर्व सुख हिरावून घेतो. परमेश्वराने आपल्याला या पृथ्वीवर पाणी दिलेले आहे, पण माणसाने त्या पाण्याचा उपयोग दारू मध्ये केलेला आहे.

या दारू मुळे त्या प्रतिष्ठित माणसाचे समाजातील सारे काही हिरावून जाते. संसार उघड्यावर पडलेला असतो. बायको बिचारी कशीबशी चार घरची कामे करून आपल्या जबाबदाऱ्या सामर्थ्याने पार पाडताना दिसते. तरीही जग तिलाच नावे ठेवत असते. पण बिचारी, आपल्या लेकरांसाठी सारे सहन करत असते. कारण तिला माहित असतं आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपणच पेलायची आहे. आपणच कुटुंबाचे सर्व काही आहोत. म्हणून ती संसाराचा गाडा अहिराणी पुढे पुढे ढकलत असते. पण तिच्या पतीला दारूच्या विळख्यातून काही सुचत नाही. कर्जाचा डोंगर देखील त्याने उभा केलेला असतो. आणि हीच दारूची बाटली एके दिवशी त्याला आनंदी जीवनातून कायमची घेऊन जाते. सारा संसार उध्वस्त होतो. धन्याची आठवण काढत काढत, आपल्या प्रपंचाचा गाढा ती ओढताना दिसते.

राजेंद्र वाणी सरांनी–व्यसनमुक्ती या कवितेतून अप्रतिम अनमोल असा संदेश आजचा तरुण पिढी पुढे मांडलेला आहे. व्यसनमुक्ती या कवितेविषयी म्हणावेसे वाटते… दारू सिगारेट व्यसनापायी
करू नका देहाला उद्धवस्त
जीवन अनमोल असूनी सदा
आरोग्याचा मंत्र जपू विश्वात.

आजच्या तरुण पिढीने राजेंद्र वाणी सरांच्या व्यसनमुक्ती या कवितेतून नक्कीच बोध घ्यावा, आपले अनमोल आयुष्य छान पणे जगावे हीच ईश्वरचरणी सदिच्छा—-!!!!
– श्रीमती वंदना शरदचंद्र पाटणे,
महुद बु, जिल्हा सोलापूर.

२. माननीय संपादक,
न्युज स्टोरी टुडे.
श्री राजेंद्र वाणी यांची व्यसनमुक्ती दिनाचे औचित्य साधून सादर केलेली “व्यसनमुक्ती” कविता आपल्या आजच्या वर्तमानपत्रातून वाचनात आली.

दारूच्या दुष्परिणामांचे विदारक परीणाम खूपच चपखत शब्दात कविताबद्ध केले आहेत. दारूचे सेवन करणे किती घातक आहे, आयुष्यातील प्रत्येक वाटेवर दारू कशाप्रकारे घात करते याचे उत्तम प्रकारे प्रबोधन केले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावणारी खूपच परिणामकारक कविता!!
– रंजना लिमये. सांताक्रुज पूर्व, मुंबई

३. मा‌. संपादक
न्यूज स्टोरी टुडे
✍️✍️✍️✍️✍️✍️

कविता व्यसनमुक्ती
वस्तुस्थिती वर्णिली
घरादाराची , देहाची
नासाडी म्या जाणली

राजू दादांची वाणी
साहित्यात दिसली
अप्रतिम काव्याची
झळक बघितली
– सौ अंजली आप्पा तरे. खानिवडे, विरार

४. राजेंद्र वाणी यांची कविता खूपच सुंदर आणि ज्वलंत, डोळ्यात अंजन घालणारी आहे .
– श्रीम.संगीता म्हात्रे. मुंबई

५. मा.संपादक, न्यूज स्टोरी टू डे यांनी प्रकाशित केलेली, जेष्ठ कवी श्री राजेन्द्र वाणी, दहीसर, मुंबई यांनी रचलेली “व्यसनमुक्ती” कविता वाचण्यात आली.
व्यसनमुक्ती डे निमित्ताने कवितेत दारु, सिगारेट, तंबाखू या सारख्या जीवघेण्या व्यसनामुळे समाजात निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधले असून व्यसनामुळे आजची कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था कशी कोलमडली आहे,याची जाणीव करून दिली आहे, त्याबद्दल मी कवी श्री राजेन्द्र वाणी यांचे खुप अभिनंदन करतो.

वास्तविक पाहता व्यसनाधीनता ही आजची समस्या नाही. खुप पूर्वीच्या काळापासून ही समस्या समाजाला भेडसावत आहे. या समस्या सोडवण्यासाठी, व व्यसनमुक्त समाज व्यवस्था निर्मिती साठी पाहिजे तसे काम झालेले दिसत नाही, किंवा पूर्वीच्या काळी ते पथनाट्य व कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती व समाज प्रबोधन करणे इ. स्वरूपात मर्यादित होते.
परंतु आता काळ खुप बदलला आहे, नूसतीच जनजागृती करून व समाज प्रबोधन करुन काम होणार नाही, त्यासाठी शासन स्तरावर व्यसनमुक्ती साठी आवश्यक कायदा करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विविध स्तरांवरावरील समाज माध्यमातून उदा. एनजीओ्ज, समाज संघटना द्वारा व्यसनमुक्ती साठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे, म्हणजे येणाऱ्या काळात एक निर्व्यसनी, सशक्त व सुदृढ पिढी निर्माण होईल.

कवी श्री राजेन्द्र वाणी यांनी कवितेच्या माध्यमातून खुप मोलाचा संदेश दिला आहे,व त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
 – आर जी गोराणे, नाशिक.

६. सन्मा. संपादक, न्यूज स्टोरी टुडे..
होऊ या व्यसनमुक्त या वाणी सरांच्या कवितेतून समाजातील व्यसनी लोकांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालून कळकळीने व्यसनापासून दूर होण्याची विनंती केली आहे. वाणीसराच्या अनेक कविता या समाजप्रबोधनपर असतातच .अतिशय कळकळीने लिहिलेले या कवितेमध्ये व्यसनाचे दुरगामी परिणाम प्रत्येक कडव्यातून मांडले गेले आहे .व्यसन मग ते कोणतेही असो ..!दारू , तंबाखू ,विडी ,सिगरेट किंवा कोणताही अंमली पदार्थ असो या मुळे पैसा,प्रकृती ,प्रतिष्ठा, लयाला जाते . सुमारे शंभर वर्षांपूर्वी राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला एकच प्याला अजूनही समाजासाठी तंतोतंत लागू पडतो. आजपर्यंत हजारो लाखो कुटूंब देशोधडीला लागली आहेत . साधं तंबाखू च व्यसन सुद्धा माणसाला कॅन्सर सारख्या रोगानी देशोधडीला लावतो.

आज खरोखर वाणीसर कवितेतून प्रबोधनाचे कार्य करीत आहे .समाजातील अनेक अनिष्ट रूढीविषयी वाणी सर कवितेतुन सतत प्रभोधन करीत आले आहेत. त्या बद्दल वाणीसराचे अभिनंदन ! 🙏🙏
– पद्माकर सावे. दहिसर ,मुंबई

७. मान. संपादक,
न्यूज स्टोरी टुडे
वाणी सरांनी ‘व्यसनमुक्ती’ ही ‘व्यसनमुक्ती डे’च्या निमित्ताने केलेली काव्यरचना. व्यसनाधीन झालेल्यांना जागे करण्यासाठी कळकळीने, मनापासून केलेली याचना असे म्हणता येईल. दारू, सिगारेट, तंबाखू, गर्द यांच्या विळख्यात सापडले गेले आहेत त्यांना अनेक उदाहरणे देऊन जागे केले आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या होणारे परिणाम उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहेत. उद्ध्वस्त झालेल्या संसाराचे, घरच्या लक्ष्मी चे, शिक्षणाच्या बाबतीत आबाळ झालेल्या पोराबाळांचेचित्र रेखाटले आहे. गेलेली अब्रु, प्रतिष्ठा, नोकरी, पद हे सारे वाचवण्यासाठी कळकळीने विनंती केली आहे. अमृतररूपी पाण्याला दारू बनवू नका असे वारंवार विनवून व्यसन मुक्त व्हा आणि आपली प्रतिष्ठा मिळवा असे सांगितले आहे. व्यसन मुक्ती कवितेतून दुष्परिणाम दाखले देऊन स्पष्ट केले आहेत. त्या बरोबर कळकळीने विनंती ही केली आहे. कविता बोधात्मक, आशावादी झालेली आहे. खऱ्या अर्थाने हा”व्यसन मुक्ती डे”साजरा केला आहे असे म्हणता येईल. 👌👌👍👍🙏🏻🙏🏻
– सुरेखा घडशी. दहिसर पश्चिम.

८. सन्माननीय संपादक, न्यूज स्टोरी टूडे .
होऊ या व्यसनमुक्त या कवितेबद्दल मान. वाणी सरांचे
हार्दिक अभिनंदन !
वाणीसरांनी या कवितेत समाजातील व्यसनाधीन घटकांसाठी उपदेशपर संदेश दिला आहे .अतिशय सोप्या भाषेत वाणी सरांनी व्यसनाचे दुष्परिणामांचा पाढाच काव्यातून वाचला आहे .
खरोखर जर व्यसनावर नियंत्रण आणले नाही तर राष्ट्रातील एक पिढीच व्यसनाच्या आहारी जाऊन नष्ट होईल. ही राष्ट्राची हानी आहे.
वाणीसराना सामाजिक व सांस्कृतिक समस्याची चांगली जाण आहे .या जाणिवेतून त्याच्या कडूनं अनेकोत्तम कविता रचल्या जातात. म्हणून वाणीसराचं खास अभिनंदन !🙏🙏
वाणीसर तुमच्या हातून ऊतरोत्तर अशाच कवितांची निर्मिती होवो अशी सदिच्छा   !🌹💐
– सुनिल म्हात्रे. जुचद्रं, वसई.

🌹माननीय संपादक,
न्यूज स्टोरी टुडे,
माझे मित्र कविराज, श्री राजेंद्र वाणी ह्यांची कविता “होऊ या व्यसन मुक्त” माझ्या वाचण्यात आली, ते शीर्षकच किती यथार्थ आहे, व्यसन मुक्ती ही काळाची गरजच आहे, आपण बरेच दिवस साजरे करतोच, त्या बरोबरीने व्यसन मुक्ती दिवस व्हायला पाहिजे तसा होत नाही, म्हणुनच कविराजांनी ह्या महात्म्याच्या दिवसांची आठवण करुन, व्यसनाचे विविध प्रकार दारू, तंबाखू, गर्द, सिगारेट आणि त्याचे दुष्परिणाम काय असतात ते आपल्या कवितेत सुंदर शब्दात गुंफलेले आहेत, खरच आहे व्यसना मुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होते, मारहाण, भांडण, आणि आपली गृहिणी मात्र ते हे मुकाट्याने सहन करत असते, लोक कर्ज बाजरी होतात, मुलाचे शिक्षणात बाधा येते, त्यांचा विकास होत नाही आणी त्यानंही वाईट सवयी लागतात.

भारत हा अफाट लोकसंख्येचा असलेला देश आहे आणी जगात त्याची लोकसंख्या दुसरा नंबर आहे.त्यात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तरुण पिढी ही भारताचे भविष्य आहे, ही पिढी फारच हुशार आणि व्यावहारिक पण आहे त्यामुळे आपला विकास होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे, पण काही तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी पण गेली आहे, त्या मागे बरीच कारण असू शकेल, म्हणून कवि आवर्जून व्यसनाच्या दुष्परिणाम चे चित्रं आपल्या कवितेतून व्यक्त करत आहेत, ज्यामुळे तरुण मंडळी व्यसनाधीन असेल किंवा होऊ नये यासाठी प्रयत्न पूर्वक त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी ह्या व्यसन मुक्ती दिवसाच्या निमित्ताने समर्पण केली आहे अशी सुंदर कल्पना खरोखरीच आगळी वेगळी आहे पण सत्य आहे.

समाजावरील होणारा वाईट परिणाम, आणी देशाच्या विकासाला आज तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवायला हवी, असे झाले तर खर्या अर्थाने व्यसनमुक्ती दिवस सार्थकी लागेल.
कविराज राजेंद्र ह्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद.
– एन बी वाणी. ठाणे

अन्य मजकुरविषयीच्या
प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत….

डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांनी, संत चरित्र आणि पारमार्थिक शब्दकोश तयार करून एक अनमोल देणगी वाचकांना दिली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद ..
प्रभात मय स्नेहसंमेलन वृत्तान्त वाचून पुन्हा एकदा तुम्हा उभयतांच कौतुक करावस वाटतंय. आपल्या घरी बोलावून असा कार्यक्रम करण्याचा त्तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, धन्य आहे तुमची…
– सुनंदा पानसे. पुणे

मधुसिंधु काव्य संमेलन म्हणजे एक आगळा वेगळा उपक्रमच.
माधुरी काकडे यांचे मनापासून अभिनंदन.

सुनंदा पानसे यांची प्रिय वसुंधरेस ही काव्यरचना सुरेखच. धरणी आणि वरुण यांच्या वियोगाचीच ही कविता !

निवडा योग्य फ्रीक्वेन्सी हा शिल्पा कुळकर्णी यांचा लेख निव्वळ अप्रतीम आहे. अत्यंत साध्या उदाहरणांतून त्यांनी जीवनाचा कितीतरी मोठा आशय आणि दिशा उलगडली आहे !!
खूप सुंदर !
–  राधिका भांडारकर. पुणे

मधुसिंधु हा अभिनव प्रकार संशोधन केल्याबद्दल धन्यवाद. 👌🏻👌🏻👌🏻
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक, यवतमाळ

“तंबाखू विरोधी दिवस”:सर्वच लेख अतिशय मार्मिक आणि वास्तव दर्शविणारे आहेत. आपले सर्वांचे हार्दिक आभार .
– माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.

महेश सासवडे यांच्या भाच्याच्या लग्नाचा सोहळा मनोरंजक. अन्नाची नासाडी आणि प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर त्यांनी केलेले भाष्य अगदी बरोबर.

काम टाळण्याची कला हे हलकं फुलक मस्त. मला माझे जॉबचे दिवस आठवले.

कुटुंब रंगलय् काव्यात प्रस्तुत केलेली भीमनवार यांची कविता फारच आवडली.
– राधिका भांडारकर

कुसुम सासवडे यांची “जगणं” ही कविता छानच. ओठवरलं गाणं: उत्तम👌
– साहेबराव पुंड. अमरावती

वाह, छान लेख सगळेच.👌
– प्रिया मोडक. मुंबई.

२ जून, शलाका कुळकर्णी यांचा
“मन झाले बाग बाग”..
हा श्रध्दा जपणारा लेख अन्तर्मुख करून गेला.

झाडांची महती सांगणारा ,बेमुर्वतखोरीने झाड तोडणार्याना दिव्य सन्देश देणारा ,देव देव ही मनाची पवित्र भावना व्यक्त करणारा , झाडांमुळे कोंडलेला श्वास पुन्हा मिळेल , आयुष्यात सोनेरी उजेड पडेल ….
किती सुंदर कल्पना ….. भटकणाऱ्या ,अवखळ मनाला झाडाचं पोषण करणारा दिव्य सन्देश खुपच मनाला भावला. शलाकाजी आपले हार्दिक धन्यवाद .
– माधव अटकोरे .ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.

दिव्यत्वाची आली प्रचिती
देवेंद्र नामे तयांसी वंदिती…
सर्मपक कविता !
प्रभात स्नेहमय
मिलनासाठी मी पण शिकागो हून आलो असतो😀😃😀since last month we are here at my sons house.
– गांधी, निवृत्त अवर सचिव, मंत्रालय. ह.मू.अमेरिका

– टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?