दुःख झेलुनी मित्र असावा
सहसंवेदना सोसणारा
आनंदाच्या क्षणात अशा या
आनंद गगनी वाटणारा !
जतन केली नाती
तेंव्हा क्षण सौख्याचे दाखवणारा
दुःख अडविण्या उंबऱ्यासम हा
मैत्र लाभो जपणारा !
कधी काजवा होऊन तेंव्हा मार्ग
काळोखात दाखवावा
टिपूर पौर्णिमेच्या चांदण्यातही
जणुं कैवल्याचे चांदणे व्हावा !
खंत नसावी मुळीच अशी ती
ना उरला मित्र एकही
पारख एकदा जरूर करावी
कळत नकळत मैत्रीचीही !
मायेचा ओला वर्षाव असो की असो अबोला
कधी बोलका
शब्दाविण संवादातूनच त्या कृतिबंध असो
अधिक लाडका !
मुक मनाच्या समर्पणाने
द्यायचे घ्यायचे राहून गेले
धुंद मैफिलीत होत रहाती
आठव बंधनांचे प्यारे न्यारे !
उगा काळजी न वहावी
समर्थ साई पाठीशी असता
अंतर्यामी विश्वासाने
भिऊ नको आश्वासक असता !
पिऊन अमृत कणाकणांचे
जिवाशीवाचे जगणे तसे अमृतासम
वागणारे जणु
मित्र लाभावे ते असे !

– रचना : सुनील चिटणीस. खेड – रत्नागिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800