अहमदाबाद येथे काल विमान पडून मृत्युमुखी पडलेल्या सर्व बंधू भगिनींनी, बालकांना श्रद्धांजली अर्पण करून, या बाबत मी माझे विचार मांडत आहे.
मुळातच काल झालेला विमान अपघात, हा अपघातच आहे की घातपात आहे ? पुन्हा ही दुर्घटना गुजरात मधील अहमदाबाद इथेच का घडली ? की मुद्दामहून तिथेच घडवली ? असे प्रश्न टिव्ही वरची दृश्ये पाहिल्यापासून मला भेडसावत आहे.

या अपघाताबद्दल विविध मान्यवरांनी दुखवटा व्यक्त केला आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येईल, असे नागरी विमान उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी कालच जाहीर केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. आता हे विमान बनविणाऱ्या बोईंग कंपनीसुद्धा विमान पडण्याच्या कारणांचा शोध घेईलच. काही तांत्रिक अडचणी लक्षात आल्या तर त्या पुढच्या मॉडेल मधून ते काढून टाकतीलच. या सर्व बाबी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर (SOP) चा भागच आहे. आणखी दोनचार दिवस लोक हळहळ करतील आणि पुन्हा जग रहाटी सुरू होईल. नव्हे ती कालपासूनच सुरूही झाली आहेच.

विमानाचा हा काही पहिलाच अपघात नाहीय आणि कालचा अपघात हा शेवटचाच असेल, असा दावाही कुणी करू शकणार नाही. पण मुळातच खरा शोध घेण्याची गरज ही आहे की, हा अपघातच होता की घातपात होता ?
हा प्रश्न पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे, जगाला आणि विशेषतः भारताला गेली अनेक वर्षे दहशतवादाने ग्रासले आहे. हा दहशतवाद प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पाकिस्तान पुरस्कृत आहे हे देखील जगजाहीर आहे.पहलगाम वर दहशतवाद्यांचा हल्ला होऊन अजून दोन महिने देखील झालेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे घातपात घडवून आणून भारताचे विमान पाडण्याचा नवा दहशतवादी प्रकार तर नाही ना ? याचा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी शोध घेतला पाहिजे. अजून पर्यंत तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने विमान पाडण्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण त्यामुळे असे झालेच नसेल ? असेही म्हणता येत नाही.

त्यामुळेच विविध देशांतील गुप्तचर संस्थांनी एकत्र येऊन या दृष्टीने देखील शोध घेतला पाहिजे. तसेच हा घातपाताचा प्रकार असेल, तर तो पुन्हा घडणार नाही, याची कठोरपणे दक्षता घेतली जाईल असे पाहिले पाहिजे. तरच जगभरातील प्रवासी निर्धोकपणे, निश्चिंतपणे विमान प्रवास करू शकतील. नाही तर मुंबईत कितीही नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यावर नाईलाजानेच लोकं कामाला लागतात आणि त्यांची हतबलता लक्षात न घेता, उलट त्यालाच “मुंबई स्पिरिट” म्हणून गौरवितात, तसेच गरजेपोटी, नाईलाजानेच लोकं विमान प्रवास करीतच राहतील आणि हे त्यांचे “स्पिरिट” म्हणून गौरविले जाईल. याबाबतीत तरी तसे होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
बरोबर आहे
शोध आणि त्यावरील उपाययोजना (Research and Development) हे नेहमीच अत्यावश्यक असते ! ते जरूर करावे , पण अन्यथा प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देऊन मानवतावादाचे खच्चीकरण होऊ नये, एवढीच प्रार्थना!
मी अशोक भाई भीमाशंकर बोरकर सेवा निवृत्त BSNL Officer Ahmadabad City.कालचा विमान अपघात आमच्या घरा पासून तीन चार किलोमीटर अंतरावर होता.आम्ही रक्तदान शिबीर मध्ये जाण्यासाठी फारच प्रयत्न केला पण सुरक्षा व्यवस्था कडक केल्या मुळे परत यावे लागले. असे का झाले याचा शोध घेण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे.हे विमान बनविणाऱ्या कंपनीचे मालक आज आले आहेत.सर्व स्तरावर शोध सुरू आहे.काय ते समोर येईलच.पण मा.भुजबळ साहेब च्या मतानुसार जर हा घातपात घडवून आणला असेल तर भविष्यासाठी आपण सुरक्षा व्यवस्था जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आली पाहिजे
या जगात दुष्ट प्रवृत्ती आहेत तोपर्यंत सामान्य लोकांना असे प्रहार झेलायला लागणार. १९८७ साली इंडियन एयर लाईन्सचे कॅनडाला २८७ प्रवासी नेणारे पाडले गेले होते. खलिस्तानी दुष्टांनी ते आम्हीच केले असे आढ्यतेने म्हटले होते. जस्टिन ट्रुडोचा बाप तेव्हा पंतप्रधान होता. बाकी काही झाले नाही पण खलिस्तानी चळवळ फोफावली.
ही घटना व्हायचे आधी २-३ दिवस अफगाणिस्तानात एका ठिकाणी या अपघातासाठी पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली काम केले गेले. आता या घटनेतून काय निष्पन्न होईल ते नंतर कळेल.