Tuesday, November 18, 2025
Homeलेखचित्रपती व्ही शांताराम

चित्रपती व्ही शांताराम

भारतीय चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे व्ही शांताराम होत. आज पासून त्यांचे 125 वे जयंती वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.
व्ही शांताराम यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव म्हणजे शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे होय. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते शांतारामबापू या नावानं ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.

शांतारामबापूंच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी पासून 1कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्यासुरेखा हरण’ या मूकपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. तिथून त्यांची घोडदौड सुरू झाली. १९२५ साली निर्माण झालेल्या सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकर्‍याची भूमिका केली .तर १९२७ साली त्यांनीनेताजी पालकर’ हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.

शांतारामबापूंनी बाबुराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षं नोकरी केली. त्यानंतर त्यांनी सर्वश्री. दामले, फत्तेलाल, धायबर, कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात प्रभात फिल्म्स'ची स्थापना केली. तेथे शांतारामबापूंना आपली कला विकसित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं.गोपाळ कृष्ण’, राणी साहेबा',खुनी खंजर’, `उदयकाल’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले.

प्रभात'चा पहिला मराठी बोलपटअयोध्येचा राजा’ १९३२ साली प्रदर्शित झाला. शांतारामबापूंनी १९३३ साली भारतातला सैरंध्री' हा पहिला रंगीत चित्रपट काढण्याचं धाडस केलं. पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला.प्रभात’ला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी अमृतमंथन'ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा १९३७ साली निर्मिलेलासंत तुकाराम’ हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. भारतात, विशेषत: महाराष्ट्रात हा चित्रपट धो धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हेनीस चित्रपट महोत्सवात तो दाखविण्यात आला. जरठ विवाहावर टीका करणारा कुंकू' (दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारामाणूस’ (आदमी) आणि हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.

शांताराम बापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन राजकमल कला मंदिर' या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली.राजकमल’च्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. राजकमल'ने १९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारीतडॉ. कोटणीस की अमर कहानी’, १९५१ सालचा होनाजी बाळांचा अमर भूपाळी', १९५५ सालचा रंगीतझनक झनक पायल बाजे’, १९५७चा नवरंग' हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले.डॉ. कोटणीस’ आणि `दो आँखे’ या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली .

चित्रपटासाठीच्या विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेऱ्याचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत. चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते.

शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकार आणि तंत्रज्ञांवर त्यांचा वचक असे. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ऍनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनी.`बॅक लिट’ प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक.

शांतारामबापूंनी तीन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. जयश्री यांना किरण हा मुलगा आणि राजश्री ही मुलगी तर विमल यांना प्रभात कुमार हा मुलगा आणि मधुरा पंडित ही मुलगी अशी अपत्ये आहेत. त्यानंतर त्यांनी कुटुंब कल्याणाची शस्त्रक्रिया केल्यामुळे संध्या यांना अपत्यप्राप्ती होऊ शकली नाही. ती कसर त्यांनी इतर मुलांना स्वतःची मुले समजून भरून काढली. काही दिवसांपूर्वीच संध्या यांचे निधन झाले.

शांतारामबापूंचे `शांताराम’ हे आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये १९८६ साली प्रकाशित झालं आहे.

शांतारामबापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रे यांनी शांताराम बापूंना चित्रपती' ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्चदादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना १९८५ साली प्रदान करण्यात आला. तर १९९२ साली भारत सरकारने त्यांना`पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानीत केले.

व्ही.शांताराम यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले. व्ही.शांताराम यांना भावपूर्ण आदरांजली.
— संदर्भ : इंटरनेट

संजीव वेलणकर

–‎ लेखन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

  1. ↩︎

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील सर on बालदिन : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”