समर्थ रामदास स्वामींनी मराठी समाजात लढाऊ वृत्ती निर्माण करून शिवरायांना पाठबळ पुरवले. अफजलखानास कसे नि कुठे भेटावे, हे चर्चा करून ठरवले. या समरप्रसंगी शिष्याच्या आसपास राहून आगळ्या गुरूने शिष्यास मनोबळ पुरवले. मिर्झाराजांबरोबर उत्तरेत जाणे अटळ ठरल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासी संप्रदायाचे मठ व चतुर शिष्यांची सविस्तर माहिती दिली. गरजेवेळी शिष्यांच्या माध्यमातून शिवबास योग्य सल्ला देण्याचे काम ते कौशल्याने करत. त्यांचे लिखाण गूढ . तिर्हाईताने वाचले तरी उमज पडू नये असे !
शिवरायांच्या जन्मापूर्वी नारायणला हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाने झपाटले. बालयोगी रामदासने तो वसा घेतला.
To read भरारीच्या लता गुठे Click here
शहाजी राजांसोबत हिंदवी स्वराज्याची योजना आखली. समर्थांनी राजगुरु व्हावे, त्यांच्या हस्ते राज्याभिषेक व्हावा, असे मनस्वी शिवबास वाटले. पण निर्मोही साधूंचा राजकारणाशी संबंध नसतो, हा समज हिताचा ठरवून नकार दिला. परिव्राजक बनून सतत फिरणारे रामदास शिवरायांचेच नव्हे तर आर्यावर्ताचे राष्ट्रगुरु बनले. ते सामान्य भिक्षेकरी नसून शक्ती नि सहिष्णुतेची आस असलेले सुजाण संत होते !
‘शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना !’ टाळ कुटण्यात भक्ती नाही , भक्तीत ज्ञानाची दीप्ती असावी, असे ठासून सांगणारे ! अनेक संस्कृत ग्रंथ अभ्यासून त्यांनी जन सामान्यांना संक्षिप्त रूपात मराठीत उपलब्ध करून दिले. ‘ मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण ‘ सर्वाविषयी या अवतरणात त्यांच्या समग्र जीवनाचा चितार आहे. त्यांच्या अनेक अवतरणांना, साहित्यात आजही सुभाषितांचा सन्मान मिळतो. ‘यत्न तो देव जाणावा’, ‘अग्नी तो चेतवावा रे ‘, ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, भागव जो जे करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ‘ असे सांगत ते प्रयत्नास देव म्हणताना परमेश्वराच्या अधिष्ठानाची थोरवीही पटवत. भक्तिहीन ज्ञानास ते प्राणहीन कलेवर ठरवत.
– लेखिका
स्मिता भागवत
टीप: भरारी प्रकाशन निर्मित , उपरोक्त पुस्तक आपल्याला घरपोच हवे असल्यास कृपया मोबाईल क्रमांक 9879617124 वर संपर्क साधावा.
खूप छान लेख 👌👌🙏🙏🚩🚩
समर्थ रामदास स्वामी चे मनाचे श्लोक आढवतात.
Nice one
प्रिय लता,
ज्यांनी ‘महाराष्ट्रधर्म मिळवावा’ या कादंबरीवर कोणीतरी अज्ञानी व्यक्तीने प्रश्न उत्पन्न केला आहेत त्यांच्यासाठी….
श्री…
सुशिक्षित असल्याचा दावा करून नीट चिकित्सा करून लिहिले पाहिजे असे नमूद करणाऱ्या आपण माफ करा, पण पुस्तकाचे धावते वाचन केले असावे. सुरुवातीस समांतर काम करणे पसंत केलेल्या समर्थांनी जेव्हा चंद्ररावाच्या फितुरीमुळे प्रत्यक्ष भेटीची गरज जाणवली तेव्हा दिवाकरच्या हस्ते पत्र पाठवून त्यांची भेट घेतली. त्याचा सविस्तर चितार २०,२१, २२ प्रकरणात आहे.१७२ व्या पानावर चंद्ररावाचा प्रश्न संपवल्याचे विशद केले आहे. त्यातर मोठा धमाका होण्याची शक्यता व्यक्त करून सतर्क राहण्याचा प्रत्यक्ष भेटीत इशारा दिला आहे. चंद्ररावच्या वधानंतरच अफजलखानाचा प्रश्न निर्माण झाला, हे आपण ओव्रलूक करत आहात, असे सखेद म्हणावे लागत आहे.
चोवीसाव्या प्रकरणात अफझलखानाच्या भेटीच्या संदर्भात दोघात झालेली सविस्तर चर्चाही (प्रत्यक्ष भेचीत दॅट प्लीज नोट) विशद केलेली आहे.आपण तेव्हा जवळपास असू, असे आश्वासन देऊन समर्थांनी स्थानबदल कसा केला,याचेही वर्णन आहे. त्यांनी शिष्यांसह ३ दिवस महामृत्यंजयाचा जप केल्याचाही सविस्तर उल्लेख आहे. त्यानंतर जावळीच्या जंगलात समर्थांच्या सल्ल्यानुसार अफजलखानास संपवल्याचे वर्णन १८४ व्या पानावर आहे. तरी आपल्या प्रतिक्रियेतील आरोप अनाठायी असल्याचे नमूद केलेले पाहून वाईट वाटते.
अशी पुस्तके लिहिण्यापूर्वी लेखक – निदान मी तरी अपार महेनत घेते. त्याचे मनःपूर्वक वाचन न करता कुणी वरवर वाचले तर लेखकास जे दुःख होईल ते मलाही झाले. नंतर तुलसी इस संसारमे भातभातके लोग… असे म्हणत मी स्वतःची समजूत घातली. यापुढे कदाचित आपण योग्य ते कराल, अशी आशा बाळगून मी थांबते.
अस्तु.
स्मिता भागवत. .
अस्तु. .
पुस्तक वाचावे अशी इच्छा निर्माण करणारा लेख आहे.
Interesting article . Well done