Wednesday, June 18, 2025
Homeलेखस्त्रीया कधी सुरक्षित होईल ?

स्त्रीया कधी सुरक्षित होईल ?

आज जग आधुनिक झालं आहे, होत आहे असं म्हणतात. परंतु आजच्या जगातही स्त्री सुरक्षित आहे का ? हा सनातन प्रश्न कायमच आहे. स्त्रीचं संरक्षण हे केवळ कागदावर अथवा भाषणापूरतेच मर्यादित आहे.मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे . स्वतःला आधुनिक व सुशिक्षित म्हणवणारे अथवा मिरवणारे अनेक जण हे स्त्रियांवर अत्याचार करतात.काही वेळा प्रतिष्ठित व श्रीमंत मंडळी देखील अत्याचार करतात. त्यांची हौस मौज भागवण्यासाठी स्त्रीचा साधन म्हणून वापर केला जातो. हे तेव्हाच थांबते जेव्हा ती स्त्री ह्या सर्व गोष्टीना कंटाळून जीव देते.

Click here to read निर्भयाला बोलता आले असते तर!

आज देखील अनेक लहान मुलीं व महिला ह्या बलात्कार रुपी राक्षसाला बळी पडतात. ह्यांनी माणुसकी विकली का ? नाही हो माणसे कुठली हे तर माणसांचा रूपातील राक्षस आहेत. यांची वासना , ह्यांची वृत्ती अनेक निरपराधांचे बळी घेते. बलात्कार करून हे त्या मुलीला मारूनही टाकतात जेणे करून तिने जगासमोर सत्य सांगू नये. ह्यांना अनेक पळवाटा देखील मिळतात. वर्षांनुवर्षे ह्यांच्यावर खटले चालतात. निकाल लागेपर्यंत दुसरे अपराध करायला मोकळे असतात.

Pic for representation

अनेक मुली व महिला अगदी रोज हे अत्याचार सहन करतात. कधी हे थांबणार ? कोण थांबवणार ह्याला ? आज ही उत्तर नाही ! एवढा हतबल झाला आहे आज मनुष्य की एवढी मोठी चूक अमानुष कृत्य करून देखील सर्वात मोठा अपराध करून सुद्धा त्याची सुटका होते. अनेक वेळा तर हे बलात्कार रुपी राक्षस हे दुसरे तिसरे कोणी इतर नसून आपलाच एखादा नातेवाईक, परिचयाचा मित्र अथवा शेजारी देखील असू शकतो. मात्र हे सर्व कटू सत्य लपवले जाते आणि हे लपवणारे आपल्याच घरातील जेष्ठ मंडळी असतात. घरातील अब्रू जाऊ नये त्यासाठी केलेला हा अट्टहास असतो .आता तुम्हीच सांगा त्या कोवळ्या मुलीची, त्या निरपराध महिलेची काय चूक आहे ? तिला किती यातना होत असतील ? जिवंतपणी ह्या मरण यातना तिला तिची काहीही चूक नसताना भोगाव्या लागतात. स्त्री ही काही उपभोग्य वस्तू नव्हे की कोणीही यावे व तिला घेऊन जावे, तिच्यावर अत्याचार करावे व तिने ते निमूटपणे सहन करावे , गप्प बसावे. आज राहून राहून वाटते की छत्रपती शिवाजी महाराज हवे होते . आज त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ पाहिजे होत्या .कारण त्यांच्या काळात स्त्रीचा खरा सन्मान केला जात असे. कोणी अत्याचार केले तर कठोर शासन होत असे . ते कायम स्त्रीचा आदर व सन्मान करत .

आज ह्या विचाराची नितांत गरज आहे. हे बाळकडू आज सर्व घरात व शाळेत प्रत्येक मुलाला दिले पाहिजे. ह्याची समाजाला अत्यंत गरज आहे. मुलांना पुस्तकी किडे न बनवता त्यांना आपले संस्कार व संस्कृतीची जाणीव करून दिली पाहिजे . हीच आजच्या काळाची गरज आहे. सरकार कोणतेही असू दे, त्या अत्याचाराचे राजकारण न करता एकत्रितपणे काम करून गुन्हेगारांना कडक शिक्षा झालीच पाहिजे .त्या पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे.त्या मुलीची जात पात ह्या गोष्टी न पाहता ती एक स्त्री आहे, ती देशाची शक्ती आहे आणि हा स्त्री शक्तीचा अपमान आहे जो कदापीही सहन केला जाऊ शकत नाही .

Pic for representation

किती सहन करावे व का ? ती एक मुलगी आहे म्हणून , ती एक स्त्री आहे म्हणून तिच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका. बलात्कार रुपी राक्षसाचा वध हा निश्चित केलाच पाहिजे . ह्या नराधमांवर, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ज्या हाताने त्याने स्त्रीला स्पर्श करण्याचे धाडस केले तो हात छाटून टाकला पाहिजे. ज्या पायाने तो त्या मुलीपर्यंत गेला ते पाय तोडून टाकले पाहिजे .ज्या वाईट नजरेनी त्यांनी ह्या मुलीकडे पाहिले ते डोळेच काढून टाकले पाहिजे. प्रत्येक क्षणी ह्यांना मरण यातना झाल्या पाहिजे. त्यांचाशी कोणीच कोणतेही नाते न ठेवता त्यांना वाळीत टाकण्याची शिक्षा दिली पाहिजे . त्यांना फाशी किंव्हा आजन्म कारावास करणे ह्या फार सोप्या शिक्षा आहेत.का म्हणून त्यांना सरकारने पोसावे ? कायदा एवढा कडक हवा की त्याची भीती त्यांच्या मनात बसली पाहिजे.त्याने केलेल्या चूकीची शिक्षा पाहून इतर कोणीही बलात्कार करण्याचे काय , स्त्रियांकडे वाईट नजरेने पहाण्याचे देखील धाडस करणार नाही.

Pic for representation

फक्त मेणबत्या पेटवून अथवा ओरडून चालणार नाही तर कायद्यात कठोर बदल होणे हे आज फार फार महत्वाचे आहे. ज्या समाजात स्त्री शक्तीची पूजा केली जाते , नवरात्रीत अनेक उपवास केले जातात , तिची आराधना करून आशीर्वाद घेतले जातात , त्याच समाजात महिला , मुली सुरक्षित नाही. सहन करणे हेच तिच्या नशिबी का ? ज्या महिलांना माहेरचा आधार नसतो अथवा पालकांना आपल्यामुळे वाईट दिवस पाहावे लागू नये , त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून काही महिला आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतात .कारण त्यांच्यांकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो . मात्र त्यांनी अशा वेळी सामाजिक संस्थांनी मदत घेतली पाहिजे.ज्या दिवशी हे सर्व थांबेल तो दिवस इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला जाईल व तोच खरा स्त्रीचा सन्मान असेल व तेच तिचे स्वातंत्र्य असेल.

– रश्मी हेडे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?