Saturday, May 17, 2025
Homeकलाचित्र सफर : ४८

चित्र सफर : ४८

“राजा हरिश्र्चंद्र”

राजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी निर्मिलेला हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे.

राजा हरिश्र्चंद्र या चित्रपटाचा कालावधी हा ३२ मिनिटे आणि २० सेकंद इतका होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन दादासाहेब फाळके यांनी केले होते. तर कथा राजेश बारहाते यांनी लिहिली होती. प्रमुख कलाकार राज बारहाते हे होते.

या निमित्ताने जाणून घेऊ या, भारतीय चित्रपट सृष्टीच्या जनकाची जीवन कहाणी….

दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वर येथे झाला होता. त्यांचे वडील संस्कृत चे विद्वान होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेश्वर येथेच झाले.

पुढे वडील बंधूंबरोबर ते मुंबईला गेले आणि मॅट्रिक तेथूनच झाल्यावर ते १८८५ मध्ये मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले आणि त्यांनी चित्रकला या विषयाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १८८६ च्या सुरुवातीला त्यांचे मोठे भाऊ शिवरामपंत यांच्यासोबत ते बडोद्याला गेले. तिथे त्यांनी मराठे कुटुंबातील मुलीशी लग्न केले. नंतर ते बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कला भवन या ललित कला विद्याशाखेत सामील झाले. त्यांनी १८९० मध्ये तेल चित्रकला आणि जलरंग चित्रकला या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी वास्तुकला आणि मॉडेलिंगमध्येही प्रवीणता मिळवली. त्याच वर्षी, फाळके यांनी एक फिल्म कॅमेरा खरेदी केला आणि छायाचित्रण, प्रक्रिया आणि छपाईचे प्रयोग सुरू केले. १८९२ च्या अहमदाबादच्या औद्योगिक प्रदर्शनात आदर्श रंगभूमीचे मॉडेल तयार केल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक देण्यात आले. त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यांच्या एका चाहत्याने त्यांना स्थिर छायाचित्रणासाठी वापरला जाणारा “महाग” कॅमेरा भेट दिला . १८९१ मध्ये, फाळके यांनी हाफ-टोन ब्लॉक्स, फोटो-लिथिओ आणि तीन-रंगी सिरेमिक फोटोग्राफी तयार करण्याच्या तंत्रांचा अभ्यास करण्यासाठी सहा महिन्यांचा कोर्स केला. कलाभवनचे प्राचार्य गज्जर यांनी फाळके यांना बाबूलाल वारुवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन-रंगी ब्लॉकमेकिंग, फोटोलिथो ट्रान्सफर, कोलोटाइप आणि डार्करूम प्रिंटिंग तंत्र शिकण्यासाठी रतलामला पाठवले.

या सर्व शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला.

१६ फेब्रुवारी १९४४ (वय ७३) त्यांचा १९१३ मध्ये प्रदर्शित झालेला “राजा हरिश्चंद्र” हा भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा पौराणिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. आपल्या १९३७ पर्यंतच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ९४ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि २७ लघुपट केले, ज्यात त्यांच्या मोहिनी भस्मासुर (१९१३), सत्यवान सावित्री (१९१४), लंका दहन (१९१७), श्री कृष्ण जन्म (१९१८) आणि कालिया मर्दन (१९१९) या प्रसिद्ध कलाकृतींचा समावेश आहे.

अशा या थोर चित्रपट महर्षीचे वयाच्या ७३ व्या वर्षी; १६ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोच्च सन्माननीय पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना केली. दादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८