येईल साठी येईल सत्तरी,
करायची नाही चिंता
प्रत्येक दिवस मजेत जगायचें,
वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता ll१ll
वय झाले म्हातारपण आले,
उगाच कोकलत बसायचं नाही
विनाकारण बाम लावुन,
चादरीत तोंड खुपसायचं नाहीं ll२ll
तुम्हीच सांगा छंद जोपायसाला,
वयाचा संबंध असतो का ?
रिकामटेकड घरात बसुन,
माणुस आनंदी दिसतो का ? ll३ll
पोटापाण्यासाठी पोर सुना,
घर सोडून जाणारच
करमत नाही करमत नाही,
सारखं सारखं म्हणायचं नाही ll४ll
आवडत्या कामात दिवस घालवायचा,
घरातल्या घरात वा बागेत,
हिंडायचे – फ़िरायला जायचे ll५ll
आता आपलं काय राहिलं
फालतु वाक्य म्हणायचे नाही,
पिढी दर पिढी चालीरीतील
थोडेफार बदल होणारच ll६ll
पोरपोरी त्यांच्या संसारात,
कळत नकळत गुंतणारच,
तु तु मै मैं जास्त अपेक्षा,
कुणाकडूनही करायच्या नाहीं ll७ll
मस्त पैकी जगायचं सोडून,
रोज रोज मरायचं नाही,
स्वतःच स्वतःला समजवायच असत,
वास्तु तथास्तु म्हणत असते,
हे उमजुन नियमान जगायचं असतं ll८ll

– रचना : कुसुम(छाया) सासवडे. पुणे
कुसुम ताई,
सस्नेह नमस्कार.
आपण आपल्या काव्यातून सुंदर सकारात्मक विचार
आमच्या पर्यंत पोहचवले आहेत,सदर विचारातून मन प्रसन्न राहील, मन आनंदी राहील आणि यातून आरोग्य चांगले राहील…
ज्याचे मन आनंदी त्याचे जीवन आनंदी !
“सकारात्मक विचार अनमोल विचार !!”
धन्यवाद !
संपादक
आदरणीय देवेंद्रजी भूजबळ साहेब,
आपलेही मनापासून आभार !
👌छान, अश्याच अशावादी सकारात्मक आणि आनंदी रहा. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा 💐🙏
छान कविता 👏👏👌👌👌