Monday, October 20, 2025
Homeसाहित्यकधी वाटते

कधी वाटते

कधी वाटते स्वैर फिरावे
रानामधूनी मुक्त मोकळे
अनवाणी पायात रूतावे
दव भरलेले गवत धाकले

उभ्या कड्याच्या खांद्यावरूनी
उडी घेतसे पीठूरपाणी
दरडीखाली दडून बसल्या
गुरख्या पोरी चिमण्यांवाणी

हिरवी हिरवी ही वनराई
रूपात आपुल्या हरकून जाई
निळ्या आभाळी निळी निळाई
निळ्या तळ्यावर निळीच साई

शीळ घालतो कुणी वल्हरी
कुणी भैरवी गातच राही
सुतार पक्षी ठेका धरतो
झांज वाजवी खारूताई

घळईमधुनी खेळ खेळती
घारी,खारी,सरडे,बगळे
शेवाळी पाण्यात पावले
स्पर्ष मखमली सूख वेगळे

— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप